"अहो झेडपी मेंबर, अर्धा कप चहा मिळेल का ?" राजाभाऊंनी सुरेखाताईंना म्हटले.राजाभाऊंची रविवारच्या सकाळी आळसांत सुरू असलेली सगळी कामे व मध्येच सोडलेले चहाचे फर्मान त्यांना नवीन नव्हते.नवीन होते ते त्यांनी दिलेले संबोधन....लटक्या रागाने वर्तमान पत्रातून डोके काढून त्यांनी मानेला झटका दिला व म्हणाल्या,"झेडपी मेंबरची स्वयंपाकीण बाई आज रजेवर आहे, चहाचा भत्ता रोखीत घेऊन बाहेरूनच चहा प्यावा आज राजेसाहेबांनी."वैशाली अजून झोपलेलीच होती. आजींची अंघोळ आटपून देवपूजेची तयारी सुरू होती. त्यांची देवपूजा आटोपताच भिजत ठेवलेले पोहे फोडणीला टाकायचे होते. तोवर पटकन आपण अंघोळ करून घ्यायच्या विचारांत असतानाच राजाभाऊंचे फर्मान सुटले होते. आता अजून पंधरा मिनिटांची खोटं ह्या विचारांत असतानाच राजाभाऊ उठून उभे होत म्हणाले,"मग असंच करावं म्हणतो.... " "हो, तेव्हढीच एखादी सिगारेट फुंकायला मिळेल ते सांगा की" त्या परत लटक्या रागाने म्हणाल्या.अधून मधून लहर आली की राजाभाऊ धूम्रपान करीत ते आता सुरेखाताईंच्या चांगले सवयीचे झालेले होते. त्यांच्याकडे मिश्कीलपणे तिरपा कटाक्ष टाकत राजाभाऊंनी पायांत चपला सरकवल्या व घातलेल्या बुशकोटाची बटणे लावत लावत बाहेर पडायची तयारी केली. सुरेखा ताई वळून स्वयंपाक घरापर्यंत पोहचल्या नसतील एव्हढ्यात राजाभाऊंचा " अरे... तू इकडे कुठे ?" असा आवाज आला म्हणून त्या मागे वळल्या. बघतात तर अंगणात प्रियांक मोटरसायकल स्टॅंडवर लावण्याच्या तयारीत होता."बाबांनी आज मीटिंग लावलीय दुपारी, तुम्हा दोघांना बोलवलंय ३ वाजता" लावलेली बाइक स्टॅंडवरून काढत तो बोलला.एक क्षण काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने त्या तश्याच उभ्या होत्या. "हो, नक्की येऊ म्हणून सांग...." पाठमोऱ्या राजाभाऊंचे शब्द त्यांनी ऐकले.'चला, रविवार सार्थकी लागला' असा मनातल्या मनात विचार करत त्या पटकन न्हाणीघरात शिरल्या.
"मी राहतो घरी, तू जाऊन ये मीटिंगला" राजाभाऊ पोहे खात म्हणाले."अहो, काहीतरीच काय ? मी एकटी कशी जाऊ?" सुरेखाताईंची खरंतर रविवारी घराबाहेर पडायची इच्छा नव्हती."मला जरा आराम करायचा आहे, मी वैशाली बरोबर राहीन तू जाऊन ये " परत राजाभाऊ बोलले.सकाळी सकाळी वाद नको म्हणून त्या तात्पुरत्या गप्प बसल्या. दुपारी जेवण झाल्यावर बोलू असा त्यांनी विचार केला.
जेवणे आटोपल्यावर आळसावल्या शरीराने दोघेही पडले होते. हळूच सुरेखाताईंनी मीटिंगला जाण्याचा विषय काढला...."सुरेखा, अगं तुझे जाणे महत्त्वाचे आहे. मी कॉलेजची कामे आहेत म्हणून येऊ शकत नसल्याचे तू कळव" राजाभाऊ बोलले."पण मी एकटी काय करू जाऊन ?" "आता प्रचारासाठी, बैठकांसाठी व इतर कामांसाठी तुला एकटीलाच फिरावे लागणार" ते म्हणाले."बापरे; कसं जमेल मला हे ? वैशुला सोडून कसं जाता येईल ? आईंना काय वाटेल ?" त्यांनी भरभर सगळे प्रश्न एकदम विचारले."आईची काळजीच नको करूस, मी तिला आज नीट समजावून सांगीन, जोवर जमतंय तोवर वैशुचं आपण तिघं मिळून करू नाहीतर एखादी बाई बघू कामाला" ते विचार पूर्वक बोलत होते."मीही बऱ्याच दिवसांपासून विचार करतेय एखादी बाई वैशुला सांभाळायला ठेवावी, आईंकडून धावपळ होत नाही आताशा" त्या बोलल्या.शेवटी सुरेखाताईंनी एकटे जायचे असे नक्की होईस्तोवर राजाभाऊंचा स्वर जडावला होता. कोपऱ्यांत भातुकलीचा खेळ मांडून आदळ-आपट करणाऱ्या वैशुचाही त्यांना त्रास जाणवत नव्हता. थोड्याच वेळांत ते चक्क घोरायला लागले.....
साडी बदलत असताना वैशुची भुणभूण चालू होती. "आई मी पन येते मीतींगला" असं लाड लाड म्हणत ती साडी खेचत होती. एकुलत्या एका सुटीच्या दिवशी तिला सोडून जायचं त्यांच्या जीवावर येत होत. अखेरीस 'मी पटकन येते' असं तिला कसंबस समजावून त्या बाहेर पडल्या तेव्हा वैशु आजीच्या मांडीवर बसून पुस्तकातली चित्रे बघत होती.शक्य झाल्यास ही निवडणूक लढवायचीच नाही ह्या विचारांसोबत त्यांनी घर सोडले.*********************आजची तेव्हढी एकच गोष्ट सुरेखाताईंच्या मनासारखी होणार नव्हती.....वासुभाऊ व संतोषभाऊंनी तालुक्यातून जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांची जागा निश्चित झाल्याचे सांगितले तेव्हा नाही म्हणायचे त्यांना सुचलेच नाही. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता तेव्हा मोहरून जाताना कुठेतरी एक काळजी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यांत दडलेली होती.वासुभाऊ व विचारे साहेबांबरोबर सुरेखा ताईंचे 'तिकीट' पक्के झाले होते. अट्रावलातून अर्थातच भराडे बाई, तर निर्मला चौधरी व माळी वहिनी ह्या दोघी तालुक्यातल्या इतर राखीव जागांवर निश्चित करण्यात आल्या. शेळके मास्तर व फिरके ह्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची जबाबदारी टाकण्यात आलेली होती. त्यांच्या सह अजून ४ जणांना तिकीट वाटप केली गेली. दोघा अपक्षांना पाठिंबा द्यायचे ठरले तर ५ जागांवरील निर्णय नंतर घेण्यात येणार होता. कोणालाच कुठल्याही जागेबद्दल तक्रार नव्हती. नव नवीन सहकारी, त्यांच्या गावांची नावे, त्यांची नावे त्या पटापट आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होत्या. शाळेत शिक्षिकेला मुलांची नावे लक्षांत ठेवण्याचा अनुभव येथे कामी आला. निवडणुकांना दीड महिना बाकी होता.
संतोषभाऊ, देसाई, विचारे साहेब व वासूभाऊ आजच रात्रीच्या गाडीने मुंबईला जाणार होते. भारतीय जनमोर्च्याशी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत युती झाल्यास बघावी असा पक्षाचा विचार होता. 'जनजागृती' व 'भा.ज.मो' ह्या दोन्ही पक्षांची विचारसरणी साधारण मिळती जुळती होती. राष्ट्रीय व राज्य पातळीवर भा.ज.मो. चे कार्य गेल्या २५ वर्षांपासून सुरू होते. मुख्य म्हणजे त्यांचाही सामना 'विकास आघाडी' शी होता. भा.ज.मो.च्या पक्षश्रेष्ठींकडून संतोषभाऊंना आजच आमंत्रण आलेले होते. ही संधी दवडायची नाही असे ठरवत पक्षाचे धुरंधर उद्याच तेथे जाऊन थडकणार होते. तालुका व राज्य पातळीवर यावलच्या जागा जनजागृतीने लढवायच्या व राष्ट्रीय पातळीवर भा.ज.मो. ला समर्थन द्यायचे असा संतोषभाऊंचा विचार होता. कदाचित काही जागा मित्रपक्षाला द्याव्या लागणार होत्या. झेड.पी. च्या जागा न देता ग्रामपंचायतीच्या जागा वेळ पडल्यास द्याव्या ह्यावर सर्वांचे एकमत झाले. म्हणूनच ५ ग्रामपंचायतीच्या जागा रिकाम्या ठेवल्या गेल्या. संतोषभाऊंच्या मनासारखे घडल्यास तालुक्यातल्या विधानसभेच्या जागेवर निवडून येण्यास नानासाहेब पाटलांना बरेच परिश्रम घ्यावे लागले असते.
'आता प्रचाराला लागा' असा आदेश घेत व पुढचे मनसुबे आखत एक एक कार्यकर्ता दुधमहासंघाचे कार्यालय सोडत होता तेव्हा जीच्याबरोबर आपली लढत आहे ती मोहिनी इंगळे कशी असावी ह्याचाच सुरेखाताई अंदाज बांधत होत्या.*******************मोहिनी इंगळे ची बदली करवून घेण्यात अखेर सुनील पाटलाला यश आलेच. नानासाहेब पाटलांचे तालुक्यातल्या तहसीलदार कचेरी सह जिल्ह्याच्या प्रत्येक सरकारी कचेरीत जबरदस्त वर्चस्व असल्याचे हे एक द्योतक होते. त्यांनीच नव्हे तर त्यांच्या दिवट्या चिरंजीवांनीही मनांत आणलेली सर्व कामे चुटकीसरशी पार पडत होती.ह्या एका महासत्तेविरुद्ध लढा द्यायचा होता तो संतोषभाऊंना आपल्या नवख्या शिपुरड्यांसह.फक्त माणसाशी असलेले माणसाचे नाते हेच काय ते त्यांचे ह्या निवडणुकीतले भांडवल होते.मोहिनी इंगळेचे जोरदार स्वागत शाळेत केले गेले त्या दिवशी वैशुला ताप आलेला असल्याकारणाने सुरेखाताई शाळेत गैरहजर होत्या.अनवधानाने एक वेगळाच संदेह त्यांच्या सहकार्यांना वाटू लागला.
"नमस्कार सुरेखा ताई" अनोळखी स्त्रीच्या आवाजाने पुस्तकातून डोकं वर काढून सुरेखाताईंनी बघितले तर एक नीटनेटकी बाई त्यांच्या समोर सुहास्यवदनाने उभी होती.'कोणाची बरं आई असावी ही' असा ठेवणीतला शिक्षकी विचार करत असतानाच "मी मोहिनी, मोहिनी इंगळे" हे वाक्य तीच्या मंजूळ स्वरांतून उमटले."नमस्कार.... नमस्कार...." असं तोंडातल्या तोंडात पुटपुटताना स्वत:चा स्वर इतका कोरडा कसा ह्याचेच त्यांना आश्चर्य वाटू लागले.स्टाफ रूम मधले सगळे जण हातातली कामे सोडून दोघींकडे बघू लागली...."बसू का तुमच्या सोबत दोन मिनिटे ?" तिने पुढे विचारले तश्या त्या वरमून बोलल्या "अरे सॉरी हं, मीच तुला बस म्हणून सांगायला हवे"ती बसत असतानाच त्या परत अपराधीपणाने बोलल्या, "माफ करा, मी तुम्हाला अग तूग केलं"."त्यात काय मोठं ? आहेच मी तुमच्याहून वयाने लहान, तुमचा हक्कच आहे तो" ती पटकन बोलली.".......""मी तुम्हाला एक खास विनंती करायला आलेय ताई" सुरेखा ताईंकडे ती रोखून बघत बोलली."हम्म बोल ना" आता त्यांच्या स्वरांतला तो कोरडेपणा कमी झालेला होता."आपण दोघी येथे शिक्षिका व बाहेर प्रतिस्पर्धी म्हणून वावरूया का ? म्हणजे मला म्हणायचे होते.... आपल्या निवडणुकांचा विषय बाहेरच ठेवून आपले इथले संबंध आपण सांभाळायचे का ?" ती जरा चाचरत बोलली."हो...आनंदाने, खरं तर मला आशाच नव्हती तुझ्याकडून ह्या प्रस्तावाची, म्हणून माझा प्रतिसाद सुरुवातीला अगदी थंड होता." सुरेखा ताई उत्साहाने म्हणाल्या."मी पण जरा घाबरतच होते, मला वाटलं होतं, सुरेखाताई म्हणजे........""एखादी जाडजूड, पोक्त, चष्मा लावणारी, दोन वेण्या घालणारी खडूस बाई असेल !" हसत हसत सुरेखाताईंनी तिचे वाक्य पूर्ण केले तेव्हा सगळे जण हास्यात बुडले.
दोघींच्यातला तणाव त्या हास्यकल्लोळाने दूर झाला.... एक चांगली सहकारीण मिळाल्याचा आनंद स्टाफ मधल्या प्रत्येकाच्या तोंडावरून दिसत होता.
***************************
Saturday, March 10, 2007
तेजस्विनी-९
"दाजी औंदाच्या झेडपी मेंबरच्या इलेक्शनची ह्यो यादी तयार हाय" सुहास पाटलाने नानासाहेबांना सांगितले."सुनिलरावांना दावली का?" नानासाहेब न बघताच बोलले. "त्यांन्सी काय दावायची ?" सुहास चाचरत बोलला.मग मोठ्या पाटलांना वर्तमान पत्रातून डोकं वर काढावंच लागलं. "का दावायची म्हंजी ? निवडणूकीला सुनिलराव उभं राहणार, आन उमेदवारांची यादी त्यांनी न्हाय बगायची तर कुणी बगायची""तसं न्हाय दाजी, नेमीचेच तर उमेदवार हाईत त्यात बगायच काय असं म्या म्हनत हुतो" सुहास सारवासारव करायला लागला."तुमची यादी माज्या जवळ दिऊन ठेवा. मी पाहतो काय करायच त्ये." अखेरीस ते बोलले. सुहासला तिकडून निघून जाण्याचा तो संदेश होता."आता जे झालं त्यावर गपगुमान इचार करा सुहासराव, घिसडघाई करून कामं नका करत जाऊ, अखेरच निक्सून सांगतोय" मोठ्या पाटलांनी त्याला बजावले. "मोठ्या दिलानं सुनिलरावांची साथ संगत करा, ही निवडणूक जिंकून दावा मग मी समदं ठीक करतो" नानासाहेब बोलले.सुहासने मान हालवत जेमतेम होकार दिला तेव्हा त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना नानासाहेबांना जाणवली."सुहासराव असे कमजोर नका पडू, मी सांगतो तुमच्या भल्यासाठी; त्यावर वाईट वाटून घेण्याऐवजी अंमल केलात तर जग जिंकाल...." नानासाहेबांनी त्याला धीर दिला. " ....तुमच्या माणसांपैकी कुनाला सदस्य बनवायच कबूल केलं हाय का तुमी?""व्हय दाजी, रावेरचे माझे साडू यंदा मागे लागलेत" त्याने हळूच सांगितले."इतकंच असेल तर त्ये काम माज्यावर सोपवा, बाकी यादी सुनिलरावांना बनवू द्या" नानासाहेब घरातही राजकारणाचे डाव व्यवस्थित खेळत. 'धाकटा सुनील मला एक दिवस बाजारात विकून येईल. मोठा सुहास फाड आहे पण मनाचा सरळ आहे' हे त्यांचे लाडके मत होते.सुनीलला बोलावले असल्याचा निरोप सांगून ते परत वाचनांत गढले. सुनील आल्यावर त्याला फक्त 'उमेदवारांची यादी तयार करून मला दुपारच्याला आणून द्या' असा हुकूम देऊन ते बैठकीवरून उठत दिवसभराच्या इतर कामांना लागले.******
संतोषभाऊ सहकार्यांबरोबर मुंबईहून परतले ते आंबट गोड बातम्या घेऊनच. तालुक्यातल्या काही जागा भा.ज.मो. ला द्याव्या लागणार होत्या तर संतोषभाऊंना विधानसभेसाठी भा.ज.मो.चे समर्थन व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे साहाय्य मिळणार होते. ज्या जागांवर 'जनजागृती'चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी तेथल्या जागा संतोषभाऊंनी भा.ज.मो. ला देऊ केल्या होत्या. पण फिरकेंची, शेळके मास्तरांची व रावेरची प्रतिष्ठेच्या लढतीची जागा हातातून गेली होती. शेळके मास्तरांची समजूत काढता काढता वासुभाऊंना नाकी नऊ आले होते.
आज पंचायतीच्या निवडणुकांच्या अर्जांवर सह्या व अनुमोदनाचा कार्यक्रम पार पडणार होता. सगळे जण दूध महासंघाच्या कार्यालयांत पोहचले तेव्हा साडे दहा वाजत आलेले होते. सुरेखा ताईंना आज रजा टाकावी लागलेलीच होती. संतोषभाऊ, वासूभाऊंसह शेकडो कार्यकर्ते वाजत गाजत मिरवणुकीने तहसीलदार कार्यालयांत पोहचले. देसाई साहेबांनी त्यापूर्वीच तेथे जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ ठरवून घेतलेली होती.मिरवणूक तहसीलदार कार्यालयांत पोहचताच सुरेखाताईंना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. राजाभाऊ जातीने तेथे हजर होते. सकाळी घाईघाईत 'बेस्ट लक' इतकंच म्हणून बाहेर पडलेले राजाभाऊ आपण अर्ज भरताना आपल्या सोबत असावेत असे सुरेखा ताईंना मनापासून वाटत होते. पण कॉलेजातली लेक्चर्स सोडून ते इतर कुठलेही कामे त्यावेळेत करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने उगीच अपशकून नको म्हणून त्या बोलल्या नाहीत.महिलांचे अर्ज सर्व प्रथम देण्यात आले. तालुक्यातली महिला उमेदवार म्हणून सुरेखाताईंचा अर्ज सर्वप्रथम पुढे करण्यात आला तेव्हा "मनुदेवी मात की जय" हा तालुक्यातल्या ग्रामदैवतेच गजर कार्यकर्त्यांनी केला.मनातल्या मनांत विघ्नहर्त्या गणेशाचे नांव घेत व अर्जावर सही करीत सुरेखा ताईंनी आपल्या राजकीय जीवनाचा शुभारंभ केला.सगळ्यांचे अर्ज भरून झाल्यावर मनुदेवीच्या डोंगरावरील मंदिरात वासुभाऊंच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मनुदेवीचा आशीर्वाद घेऊन आजपासूनच प्रचाराची सुरुवात व जंगी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सायंकाळची प्रचाराची जंगी सभा बाजार वार्डातल्या मोठ्या चौकात भरणार होती. कधी प्रजासक्ताक दिनाच्या भाषणालाही हजेरी न लावलेली सुरेखा नावाची शालीन सुशिक्षित तरुणी, एका कन्येची माता, सुविद्य प्राध्यापकाची सुविद्य पत्नी, घरातल्या वरिष्ठांची आज्ञाधारक स्नुषा... मुलगी आज राजकीय व्यासपीठावर पक्षाच्या व स्वत:च्या प्रचारासाठी एका खुर्चीत अंग चोरून बसली होती.देसाई साहेबांच्या प्रस्तावने नंतर लगेच संतोषभाऊंनी भाषणाला सुरुवात केली. यावल तालुक्यातल्या आजवरच्या समस्या व विरोधकांनी केलेली जनतेची फसवणूक ह्यावर त्यांनी जोरदार भाषण केले. टाळ्यांच्या गजरात ते खाली बसले तोवर ते नेमके काय काय बोलले हे आठवण्याच्या मन:स्थितीतही सुरेखाताई नव्हत्या.मान्यवर व वयोवृद्ध वासुभाऊंचे भाषण नेहमीच श्रोत्यांना भावे. तालुक्यातच लहानाचे मोठे झालेले वासुभाऊ अविवाहित होते. अनाथालयातून वाढलेल्या वासुभाऊंना 'खडकू' भाऊ म्हणूनही ओळखत. एक एक पैशाचे, ज्याला गावात खडकू म्हणतं, दान घेत त्यांनी गावाच्या विकासासाठी व खास करून शाळेसाठी निधी उभारला होता. दिवसांतून फक्त एक वेळा जेवण्याचा आजन्म संकल्प त्यांनी अनाथालयात असतानाच घेतला होता. त्यांच्या भाषणांतून गरीब व पिचलेल्या लोकांसाठीची त्यांची तळमळ दिसून आली. त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगांनी सुरेखाताईच नव्हे तर बऱ्याच उपस्थितांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या.भराडे बाईंचे भाषण आवेशपूर्ण होते परंतू त्याचा सर्व भर नानासाहेब पाटील व त्यांची मुले ह्यावर दिलेला होता. स्वत:च्या भाषणातून पाटलांचा करता येईल तितका पाणउतारा त्यांनी करून घेतला. झोपडपट्टी वासीयांची ही कैवारीण त्यांचे प्रश्न मांडत असताना स्वत:ला मिळणारा प्रतिसाद बघून अजून चेतावत होती. मोठ्या आवेशात तिचे भाषण संपले.हळूहळू ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे संपताच, नांव पुकारले गेले सुरेखाताईंचे.गांवातली भोळी जनता समोर बसलेली होती.... कोणी दगडावर, कोणी वाड्याच्या भिंतीवर तर कोणी गच्चीच्या कठड्यावर.... महिला वर्ग कुणाच्या ओट्यावर बसला होता तर कोणाच्या दरवाज्यातल्या उंबरठ्यावर..... कुठल्या तरी दरवाज्याआडून एखादा शालीन पदर डोकावून बघत होता तर कुठे कोणी आई आपल्या रडणाऱ्या पोराला गप्प बसण्यास सांगत होती. सगळेच जण कुतूहलाने आज ही मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला जीवाचे कान करून बसले होते.सुरेखाताईंना दरदरून घाम फुटला. शाळेत मुलांना शिकवणे व व्यासपीठावरून भाषण देणे ह्यातला फरक आज त्यांना कळला. पदराने कपाळावरचे घर्मबींदू टिपत व उसने आणलेले धैर्य दाखवत त्या माइक समोर जाऊन उभ्या राहिल्या. उंचाड्या विचारे साहेबांचे भाषण नेमके त्यांच्या आधीच झालेले होते म्हणून माइकची उंची व सुरेखाताईंची उंची मेळ खात नव्हती. हे लक्षात येताच माइक वाल्या पोऱ्याने विविध आवाज काढत माइक त्यांना साजेसा केला. तोवर निःशब्द शांतता सर्वदूर पसरलेली होती.
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर........" पाच ते सात मिनिटांत त्यांनी आपले भाषण संपवले तेव्हा आपली कानशिले गरम झाल्याचा भास त्यांना होत होता. मर्यादित टाळ्या वाजल्या पण बऱ्याच कौतुकांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या असल्याचे त्यांना जाणवले.
"आज माझं भाषण कसं झालं हो ?" रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी राजाभाऊंना विचारले."छान झालं, काळजी करण्याचे कारणच नाही." आश्वस्तपणे राजाभाऊ बोलले."मी भाषणांत काय काय बोलली हो ?" सुरेखाताईंनी त्यांना पुढे विचारले.त्यांच्या ह्या वाक्यावर डोळ्यांतून पाणी येईपर्यंत राजाभाऊ खळखळून हसत होते....बाबा हसताहेत म्हणून वैशुही आनंदाने टाळ्या पिटत नाचून हसू लागली.....सुरेखाताईंना आपल्याच लोकांसमोर मेल्याहून मेल्यासारखे झाले !********************************************************भाषणाबाबत शाळेत सहकार्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत होत्या."छान भाषण केलंस हो पोरी..... आता ह्यापुढे थोडी तयारी करून व्यासपीठावर जात जा. राजाभाऊंकडून मुद्दे लिहून घ्यायचे - पण पूर्ण भाषण स्वत: तयार करायचे" थोडक्यातच वैद्यबुवांनी स्वत:ची प्रतिक्रिया दिली. तेव्हा मोहिनीची प्रतिक्रिया काय मिळेल ह्या विचारांतच सुरेखा ताई होत्या.मोहिनी हेडमास्तरांच्या खोलीतच डेरा घालून बसलेली असे. वर्गात फळ्यावर मुलांना "हे वहीत उतरवून घ्या' असं सांगून ती हेडमास्तरांच्या खोलीत जाऊन बसे. मधल्या सुटीत मोहिनीशी भेट झाली."मला तर बाई ह्या राजकीय भाषणांचा कंटाळाच येतो. माझ्या ऐवजी पक्षातले कोणीतरी भाषण ठोकेलच की व्यासपीठावर...." इतकीच प्रतिक्रिया तिची होती.शाळेत राजकारणावर बोलायचे नाही असा सगळ्यांचा पण पहिल्या दिवशीच तुटला. आपल्यातलीच दोघींपैकी एक सहकारीण झेडपी सदस्य होणार म्हटल्यावर असले संकल्प तडीस नेणे शाळेतल्या शिक्षकांनाही कठीण जाणार होते.*****************प्रचाराला हळूहळू जोर चढत चालला होता. भिंती रंगवणे, पोस्टर्स लावणे, पत्रके वाटणे ही कामे तरुण कार्यकर्ते जोमाने करीत होती. प्रियाला सोबत घेत सुरेखा ताईंच्या नाक्यानाक्यावर छोट्या बैठका होत होत्या. स्त्रियांना घरात आतवर जाऊन सुरेखा ताई भेटून येत होत्या. 'दादा, वहिनी, ताई, भाऊ, अक्का, माई, नाना, दाजी असली सगळी विशेषणे चपखलपणे वापरता येऊ लागलेली होती. बोलण्यातली सफाई वाढत होती. शब्दांना धार येत होती. राजाभाऊंनी लिहून दिलेले मुद्दे त्या विस्तृत करीत चांगले भाषण देऊ लागल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांवर हिरीरीने बोलत होत्या.
यावलला लागून असलेल्या भुसावळ तालुक्यात भा.ज.मो.च्या जास्त जागा होत्या. जनजागृतीने फक्त एक दोघा अपक्ष उमेदवारांना समर्थन जाहीर केले होते पण त्यांचे स्वत:चे उमेदवार उभे केलेले नव्हते. भुसावळ तालुक्यातल्या भा.ज.मो.च्या उमेदवारांना उत्साह व समर्थन मिळावे म्हणून संतोषभाऊ तेथल्या सभांना नियमित जाऊ लागले.इथल्या सभा कधी वासूभाऊ, विचारे साहेब, तर कधी शेळके मास्तर, भराडे बाईंबरोबर गाजत होत्या. भराडे बाईंच्या अट्रावलातल्या दोन्ही सभांना जोरदार प्रतिसाद मिळालेला होता, ह्यापुढे अट्रावलात सभा घ्यायची आवश्यकत: त्यांना पडणारच नव्हती. त्यांची जागा ह्या निवडणूकीत नक्की झाल्यातच जमा होती. निर्मला ताई व माळी वहिनींनाही चांगलाच प्रतिसाद मिळत होता. ह्यापूर्वी असलेली राजकीय पार्श्वभुमी त्यांना मदतीची ठरत होती. गांवात प्रचार सभांच्या हजेरीवरून अटकळी बांधल्या जात होत्या. सुरेखा ताईंच्या जागेबद्दल मात्र कोणीच काही बोलायला तयार नव्हते.*****************************
संतोषभाऊ सहकार्यांबरोबर मुंबईहून परतले ते आंबट गोड बातम्या घेऊनच. तालुक्यातल्या काही जागा भा.ज.मो. ला द्याव्या लागणार होत्या तर संतोषभाऊंना विधानसभेसाठी भा.ज.मो.चे समर्थन व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे साहाय्य मिळणार होते. ज्या जागांवर 'जनजागृती'चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी तेथल्या जागा संतोषभाऊंनी भा.ज.मो. ला देऊ केल्या होत्या. पण फिरकेंची, शेळके मास्तरांची व रावेरची प्रतिष्ठेच्या लढतीची जागा हातातून गेली होती. शेळके मास्तरांची समजूत काढता काढता वासुभाऊंना नाकी नऊ आले होते.
आज पंचायतीच्या निवडणुकांच्या अर्जांवर सह्या व अनुमोदनाचा कार्यक्रम पार पडणार होता. सगळे जण दूध महासंघाच्या कार्यालयांत पोहचले तेव्हा साडे दहा वाजत आलेले होते. सुरेखा ताईंना आज रजा टाकावी लागलेलीच होती. संतोषभाऊ, वासूभाऊंसह शेकडो कार्यकर्ते वाजत गाजत मिरवणुकीने तहसीलदार कार्यालयांत पोहचले. देसाई साहेबांनी त्यापूर्वीच तेथे जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ ठरवून घेतलेली होती.मिरवणूक तहसीलदार कार्यालयांत पोहचताच सुरेखाताईंना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. राजाभाऊ जातीने तेथे हजर होते. सकाळी घाईघाईत 'बेस्ट लक' इतकंच म्हणून बाहेर पडलेले राजाभाऊ आपण अर्ज भरताना आपल्या सोबत असावेत असे सुरेखा ताईंना मनापासून वाटत होते. पण कॉलेजातली लेक्चर्स सोडून ते इतर कुठलेही कामे त्यावेळेत करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने उगीच अपशकून नको म्हणून त्या बोलल्या नाहीत.महिलांचे अर्ज सर्व प्रथम देण्यात आले. तालुक्यातली महिला उमेदवार म्हणून सुरेखाताईंचा अर्ज सर्वप्रथम पुढे करण्यात आला तेव्हा "मनुदेवी मात की जय" हा तालुक्यातल्या ग्रामदैवतेच गजर कार्यकर्त्यांनी केला.मनातल्या मनांत विघ्नहर्त्या गणेशाचे नांव घेत व अर्जावर सही करीत सुरेखा ताईंनी आपल्या राजकीय जीवनाचा शुभारंभ केला.सगळ्यांचे अर्ज भरून झाल्यावर मनुदेवीच्या डोंगरावरील मंदिरात वासुभाऊंच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मनुदेवीचा आशीर्वाद घेऊन आजपासूनच प्रचाराची सुरुवात व जंगी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सायंकाळची प्रचाराची जंगी सभा बाजार वार्डातल्या मोठ्या चौकात भरणार होती. कधी प्रजासक्ताक दिनाच्या भाषणालाही हजेरी न लावलेली सुरेखा नावाची शालीन सुशिक्षित तरुणी, एका कन्येची माता, सुविद्य प्राध्यापकाची सुविद्य पत्नी, घरातल्या वरिष्ठांची आज्ञाधारक स्नुषा... मुलगी आज राजकीय व्यासपीठावर पक्षाच्या व स्वत:च्या प्रचारासाठी एका खुर्चीत अंग चोरून बसली होती.देसाई साहेबांच्या प्रस्तावने नंतर लगेच संतोषभाऊंनी भाषणाला सुरुवात केली. यावल तालुक्यातल्या आजवरच्या समस्या व विरोधकांनी केलेली जनतेची फसवणूक ह्यावर त्यांनी जोरदार भाषण केले. टाळ्यांच्या गजरात ते खाली बसले तोवर ते नेमके काय काय बोलले हे आठवण्याच्या मन:स्थितीतही सुरेखाताई नव्हत्या.मान्यवर व वयोवृद्ध वासुभाऊंचे भाषण नेहमीच श्रोत्यांना भावे. तालुक्यातच लहानाचे मोठे झालेले वासुभाऊ अविवाहित होते. अनाथालयातून वाढलेल्या वासुभाऊंना 'खडकू' भाऊ म्हणूनही ओळखत. एक एक पैशाचे, ज्याला गावात खडकू म्हणतं, दान घेत त्यांनी गावाच्या विकासासाठी व खास करून शाळेसाठी निधी उभारला होता. दिवसांतून फक्त एक वेळा जेवण्याचा आजन्म संकल्प त्यांनी अनाथालयात असतानाच घेतला होता. त्यांच्या भाषणांतून गरीब व पिचलेल्या लोकांसाठीची त्यांची तळमळ दिसून आली. त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगांनी सुरेखाताईच नव्हे तर बऱ्याच उपस्थितांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या.भराडे बाईंचे भाषण आवेशपूर्ण होते परंतू त्याचा सर्व भर नानासाहेब पाटील व त्यांची मुले ह्यावर दिलेला होता. स्वत:च्या भाषणातून पाटलांचा करता येईल तितका पाणउतारा त्यांनी करून घेतला. झोपडपट्टी वासीयांची ही कैवारीण त्यांचे प्रश्न मांडत असताना स्वत:ला मिळणारा प्रतिसाद बघून अजून चेतावत होती. मोठ्या आवेशात तिचे भाषण संपले.हळूहळू ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे संपताच, नांव पुकारले गेले सुरेखाताईंचे.गांवातली भोळी जनता समोर बसलेली होती.... कोणी दगडावर, कोणी वाड्याच्या भिंतीवर तर कोणी गच्चीच्या कठड्यावर.... महिला वर्ग कुणाच्या ओट्यावर बसला होता तर कोणाच्या दरवाज्यातल्या उंबरठ्यावर..... कुठल्या तरी दरवाज्याआडून एखादा शालीन पदर डोकावून बघत होता तर कुठे कोणी आई आपल्या रडणाऱ्या पोराला गप्प बसण्यास सांगत होती. सगळेच जण कुतूहलाने आज ही मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला जीवाचे कान करून बसले होते.सुरेखाताईंना दरदरून घाम फुटला. शाळेत मुलांना शिकवणे व व्यासपीठावरून भाषण देणे ह्यातला फरक आज त्यांना कळला. पदराने कपाळावरचे घर्मबींदू टिपत व उसने आणलेले धैर्य दाखवत त्या माइक समोर जाऊन उभ्या राहिल्या. उंचाड्या विचारे साहेबांचे भाषण नेमके त्यांच्या आधीच झालेले होते म्हणून माइकची उंची व सुरेखाताईंची उंची मेळ खात नव्हती. हे लक्षात येताच माइक वाल्या पोऱ्याने विविध आवाज काढत माइक त्यांना साजेसा केला. तोवर निःशब्द शांतता सर्वदूर पसरलेली होती.
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर........" पाच ते सात मिनिटांत त्यांनी आपले भाषण संपवले तेव्हा आपली कानशिले गरम झाल्याचा भास त्यांना होत होता. मर्यादित टाळ्या वाजल्या पण बऱ्याच कौतुकांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या असल्याचे त्यांना जाणवले.
"आज माझं भाषण कसं झालं हो ?" रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी राजाभाऊंना विचारले."छान झालं, काळजी करण्याचे कारणच नाही." आश्वस्तपणे राजाभाऊ बोलले."मी भाषणांत काय काय बोलली हो ?" सुरेखाताईंनी त्यांना पुढे विचारले.त्यांच्या ह्या वाक्यावर डोळ्यांतून पाणी येईपर्यंत राजाभाऊ खळखळून हसत होते....बाबा हसताहेत म्हणून वैशुही आनंदाने टाळ्या पिटत नाचून हसू लागली.....सुरेखाताईंना आपल्याच लोकांसमोर मेल्याहून मेल्यासारखे झाले !********************************************************भाषणाबाबत शाळेत सहकार्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत होत्या."छान भाषण केलंस हो पोरी..... आता ह्यापुढे थोडी तयारी करून व्यासपीठावर जात जा. राजाभाऊंकडून मुद्दे लिहून घ्यायचे - पण पूर्ण भाषण स्वत: तयार करायचे" थोडक्यातच वैद्यबुवांनी स्वत:ची प्रतिक्रिया दिली. तेव्हा मोहिनीची प्रतिक्रिया काय मिळेल ह्या विचारांतच सुरेखा ताई होत्या.मोहिनी हेडमास्तरांच्या खोलीतच डेरा घालून बसलेली असे. वर्गात फळ्यावर मुलांना "हे वहीत उतरवून घ्या' असं सांगून ती हेडमास्तरांच्या खोलीत जाऊन बसे. मधल्या सुटीत मोहिनीशी भेट झाली."मला तर बाई ह्या राजकीय भाषणांचा कंटाळाच येतो. माझ्या ऐवजी पक्षातले कोणीतरी भाषण ठोकेलच की व्यासपीठावर...." इतकीच प्रतिक्रिया तिची होती.शाळेत राजकारणावर बोलायचे नाही असा सगळ्यांचा पण पहिल्या दिवशीच तुटला. आपल्यातलीच दोघींपैकी एक सहकारीण झेडपी सदस्य होणार म्हटल्यावर असले संकल्प तडीस नेणे शाळेतल्या शिक्षकांनाही कठीण जाणार होते.*****************प्रचाराला हळूहळू जोर चढत चालला होता. भिंती रंगवणे, पोस्टर्स लावणे, पत्रके वाटणे ही कामे तरुण कार्यकर्ते जोमाने करीत होती. प्रियाला सोबत घेत सुरेखा ताईंच्या नाक्यानाक्यावर छोट्या बैठका होत होत्या. स्त्रियांना घरात आतवर जाऊन सुरेखा ताई भेटून येत होत्या. 'दादा, वहिनी, ताई, भाऊ, अक्का, माई, नाना, दाजी असली सगळी विशेषणे चपखलपणे वापरता येऊ लागलेली होती. बोलण्यातली सफाई वाढत होती. शब्दांना धार येत होती. राजाभाऊंनी लिहून दिलेले मुद्दे त्या विस्तृत करीत चांगले भाषण देऊ लागल्या होत्या. महिलांच्या प्रश्नांवर हिरीरीने बोलत होत्या.
यावलला लागून असलेल्या भुसावळ तालुक्यात भा.ज.मो.च्या जास्त जागा होत्या. जनजागृतीने फक्त एक दोघा अपक्ष उमेदवारांना समर्थन जाहीर केले होते पण त्यांचे स्वत:चे उमेदवार उभे केलेले नव्हते. भुसावळ तालुक्यातल्या भा.ज.मो.च्या उमेदवारांना उत्साह व समर्थन मिळावे म्हणून संतोषभाऊ तेथल्या सभांना नियमित जाऊ लागले.इथल्या सभा कधी वासूभाऊ, विचारे साहेब, तर कधी शेळके मास्तर, भराडे बाईंबरोबर गाजत होत्या. भराडे बाईंच्या अट्रावलातल्या दोन्ही सभांना जोरदार प्रतिसाद मिळालेला होता, ह्यापुढे अट्रावलात सभा घ्यायची आवश्यकत: त्यांना पडणारच नव्हती. त्यांची जागा ह्या निवडणूकीत नक्की झाल्यातच जमा होती. निर्मला ताई व माळी वहिनींनाही चांगलाच प्रतिसाद मिळत होता. ह्यापूर्वी असलेली राजकीय पार्श्वभुमी त्यांना मदतीची ठरत होती. गांवात प्रचार सभांच्या हजेरीवरून अटकळी बांधल्या जात होत्या. सुरेखा ताईंच्या जागेबद्दल मात्र कोणीच काही बोलायला तयार नव्हते.*****************************
तेजस्विनी-१०
मोहिनी इंगळेला बघायला खूप गर्दी जमायची. मोहिनीचे भाषण म्हणजे 'ह्याला मत द्या, त्याला मत द्या व बरोबरीने मलाही मत द्या' इतकेच असे. पण तरी खाली बसल्यावर तिला मिळणाऱ्या टाळ्या बरेच काही सांगून जात होत्या. निवडणुका दहा दिवसांवर येऊन ठेपल्या. प्रचाराला जास्त वेळ मिळावा म्हणून राजाभाऊ व सुरेखा वहिनींनी रजा टाकलेली होती. संतोषभाऊंनी घेतलेल्या एका बैठकीत उद्यापासूनच आसपासच्या खेड्यांवरच्या प्रचारावर भर देण्यात येणार असल्याचे घोषित केले. संतोषभाऊ, देसाई साहेब, राजाभाऊ अशी निवडणुका न लढवणारी एक फौज भाजमोच्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांच्या उमेदवारांच्या जाहीर सभांना व प्रचाराच्या कार्याला जुंपली गेली तर जनजागृतीचे खंदे कार्यकर्ते व निवडणुका लढवत असलेले उमेदवार एकत्र प्रचाराला निघत.कधी त्यांची गाठ 'विकास आघाडी' च्या कार्यकर्त्यांशी समोरासमोर होई. ओळखीचा गट असल्यास हस्तालोंदनापासून ते गळाभेटी पर्यंत सर्व उपचार हसत हसत पार पडत. कधी हळूच एकमेकांना शाब्दिक चिमटे काढत वातावरण खेळीमेळीचे ठेवले जाई..... तर कधी अनोळखी कार्यकर्ते समोर दिसल्यास जोरदार घोषणा युद्ध होई. एकमेकांच्या नेत्यांचा जाहीर उद्धार केला जाई, 'अमक्याच्या बैलाला ढोल... वगैरे शाब्दिक चकमकीही झडत. हे सगळे वातावरण सुरेखाताईंना नवखे होते. पण त्या आता ह्या वातावरणात चांगल्याच रुळल्या होत्या.ओरडून ओरडून व सतत बोलून घसा दुखे, मग दिवसांतून आठ दहा वेळा गरम पाण्याने गुळण्या करून घसा शेकावा लागे.
खेड्यातल्या प्रचार सभांसाठी दोन जीपड्या व १४/१५ कार्यकर्त्यांसोबत त्यांना जावे लागे. खडक्यातल्या प्रचारसभेसोबत माहेजी, वरणगांव, मुक्ताईनगर वगैरे गावांतला प्रचार एक दिवस ठरला. नेहमीप्रमाणे जीपमध्ये पुढे त्या व अजून दोन महिला कार्यकर्त्या तर मागे तरुणांचा तांडा व दुसऱ्या गाडीत इतर काही पोरांबरोबर आज प्रियांकही आलेला दिसला. त्याला ओळखीचे एक स्मितहास्य देत त्या गाडीत बसल्या. ह्या मतदारसंघांत वासूभाऊंनी बरेच कार्य केले होते. त्यांना प्रचारसभेला न नेता त्यांच्या वयाचा मान ठेवण्याची गळ मतदारांना घालायची ठरले. प्रथमच सुरेखाताईंनी भाषणांचा सर्व भार स्वत:वर उचललेला होता. दोन चारशे जणांच्या धनगरवस्त्यांपासून वरणगांवातल्या बसस्टॅंड समोरच्या जंगी सभांतून त्यांनी दणदणीत भाषणे केली.महिलांच्या समस्या, शेतकरी महिलांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार, दारूबंदी इत्यादी प्रत्येक घरगुती समस्यांवर सुरेखाताई आवर्जून बोलत. "ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत येथले स्थानिक प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत तेव्हा त्यावरच जास्त भर दे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महिला समस्यांवर बोलू नकोस कारण त्यात येथल्या बायकांना काहीही रस नाही" हा राजाभाऊंचा इशारा त्यांनी बरोबर अमलांत आणलेला होता. त्यामुळे जेव्हा भाषण संपल्यावर त्या बायकांशी थेट भेटून संवाद साधत तेव्हा त्यांच्या भाषणाची पावती त्यांना लगेच मिळे.खेड्याखेड्यांतून सुरेखाताईंना चांगला प्रतिसाद मिळत होता. पुरूष वर्गही त्यांच्या भाषणाची खिल्ली न उडवता, मास्तरीण बाईचे भाषण मन लावून ऐकत. भराडे बाईंइतक्या टाळ्या मिळत नसल्या तरी मोहिनी सारख्या शिट्ट्याही पडत नव्हत्या. एक शोभेची किंवा बोलभांड बाई कशी असते ते बघण्याऐवजी मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला गाव~खेड्यातली लोकं गर्दी करीत होती.
मुक्ताईनगरची त्या दिवसातली शेवटची प्रचारसभा संपली तेव्हा रात्रीचे आठ वाजत आलेले होते. स्थानिक महिलांसोबत फिरत त्यांनी घराघरांतून थोडा प्रचारही करून घेतला. सोबत आलेला भाजमोच्या तरुणांच्या तांड्याने बसवलेले वगनाट्य व्यासपीठावर सुरू होते. नानासाहेब पाटलांचे व त्यांच्या दिवट्या चिरंजीवाचे अत्याचार हा वगनाट्यातला छुपा विषय होता. वगनाट्याला पडत असलेल्या लोकांच्या टाळ्या व शिट्ट्यांची आता चांगलीच सवय झालेली होती. दोन चार तरुण पोरांबरोबर प्रियांकही घरोघरी प्रचार करण्यासाठी सोबत घुटमळत होता. वगनाट्य संपले तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजलेले होते. तिथल्याच एका कार्यकर्त्याच्या घरी झुणका भाकरीच्या साध्या जेवणाचा कार्यक्रम आटोपला व तांडा घरी परतण्यासाठी निघाला.मध्येच ऍक्सल का काय तुटला म्हणून सुरेखा ताईंचं जीपडं बंद पडले. मनातल्या मनात त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. शेवटी दुसऱ्या जीपड्यांत बायका व मावतील तितकी मंडळी कोंबून बसवून न्यायच ठरलं. पाच सहा जण मागेच राहिली. परतीच्या प्रवासांत थकलेल्या सुरेखाताईंना झोपेची ग्लानी चढत होती. रस्त्यातल्या खड्ड्यांतून बसणारे आचके डोकं वर आपटवत होते. आधारासाठी जेमतेम समोरचा दांडा धरून त्या बसल्या होत्या. उजवीकडे शेजारी बसलेल्या दोघी बायका प्रत्येक खड्ड्यागणिक अंगावर आदळत होत्या. डावीकडे बसलेला प्रियांक जवळपास जीपच्या बाहेरच लोंबकळत होता. आधारासाठी त्याने मागच्या सीटवर ठेवलेला हात सारखा सुरेखाताईंच्या खांद्यावर घसरत होता म्हणून त्या थोड्या पुढे सरकल्या, इतक्याश्या जागेतही थोडी जागा बनवून प्रियांक मध्ये सरकल्याचे त्यांना जाणवले.त्यानंतर जे घडतं गेले तो प्रकारच त्यांच्यासाठी भयावह होता. प्रियांकने आधारासाठी ठेवलेला मागचा हात सरळ उजव्या खाकेत सरकवून त्यांना स्वत:कडे ओढायला सुरुवात केली. एक दोन वेळा तोंडाने 'चक्क' असा आवाज करीत त्या थोड्या मध्ये सरकल्या पण त्यामुळे प्रियांकसाठी सरकायला अजूनच जागा तयार झाली. शेवटी 'प्रियांक, नीट बस' अस सांगूनही तो बधेना. त्याच्या मनातले घाणेरडे विचार त्याच्या अंगलटीला येणाऱ्या कृतीतून स्पष्ट कळत होते. नशिबाने घर आले व सुरेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला. मागे वळूनही न पाहता तरतर त्या घराकडे चालू लागल्या.त्यांच्या अंगातल्या घामाच्या धारा व डोळ्यांतला संताप बघून राजाभाऊही क्षणभर अवाक झाले."काय झाले गं ?" ह्या त्यांच्या प्रश्नाला "अंघोळ करून येते, मग सांगते." इतकेच उत्तर देत त्या सरळ न्हाणीघरांत शिरल्या.
उजवी खाक खसखसून घासली तरी प्रियांकने तेथे केलेला तो घाणेरडा स्पर्श त्यांना अजूनही जाणवत होता.*****************************सुहास पाटलांच्या मनाजोगती एकुलती एक रावेरची जागा त्यांच्या साडूला मिळाली. त्या जागेवरून नानासाहेबांच्या समोरच दोघा भावांत चांगलीच जुंपली. रावेरला विरोधी पक्षातर्फे भाजमो चा नवीन उमेदवार होता. ह्या रणधुमाळीतली विकास आघाडीची तीच जागा 'सेफ सीट' मानली जात होती. जनजागृती व भाजमो ची युती झाल्यानंतर भाजमो च्या वाट्याला आलेल्या रावेरच्या ह्या जागेवरून सुहास पाटलांचा साडू राजू यावलकर उभा होता त्याला सरळ लढत होती ती भाजमोच्या कॉलेज कुमार नवख्या अजय फालकची.तालुक्यातल्या बाकी सर्व जागांवर सुनीलच्या माणसांना अपार कष्ट घ्यावे लागणार होते. नानासाहेब पाटील जातीने स्वत: प्रचारात उतरले होते. तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या समर्थकांना पूर्ण प्रदेश पिंजून काढण्याची सक्त ताकीद देण्यात येत होती. कुठेही विरोधकांनी डोके वर काढू नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा नानासाहेबांनी कामाला जुंपलेली होती. राजेंद्र गाजरेनेही स्वत:ची कुमक सुनीलसाठी कामाला लावलेली होती. मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडलेल्या पंचायतीच्या ८ अशा ११ जागांसाठी विकास आघाडीने स्वत:ची असलेली नसलेली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून लढत देण्याच्या तयारी केली होती.विचारेसाहेबां समोर सुनीलची सरळ लढत होती. फेगडेंची लढत वासूभाऊंशी होती तर मोहिनी इंगळे समोर पाटलांची मावसं सून सुरेखा जाधव उभी होती. अट्रावलची जागा नानासाहेबांच्या हातून गेल्यातच जमा होती. तर निंभोरा, सावदा येथे मिळालेल्या उमेदवार विरोधी पक्षांच्या महिला उमेदवारांच्या समोर मिळमिळीतच होत्या. उरलेल्या ५ जागांवर संमिश्र यश जमेस धरले तरी ह्यावेळी तालुक्यात पक्षाला व पर्यायाने नानासाहेबांना जोरदार फटका पडणार असल्याचे जवळ जवळ निश्चित होते. सुनील पाटलाच्या रागाचे कारणही तेच होते. जवळच्या साथीदारांना सहजसाध्य मतदारसंघ रावेरचा होता व तोच सुहासच्या साडूला द्यावा लागलेला होता.प्रचाराचा शेवट जवळ येत होता. शेवटची रणधुमाळी सुरू होत होती. सभा गाजू लागलेल्या होत्या. गांवात शेवटच्या सभा नानासाहेब, राजेंद्र, सुनील व सुहासने ठरवल्या होत्या. पूर्ण ताकद शेवटच्या घावासाठी राखून ठेवण्यात येणार होती.***************************राजाभाऊंना झोपलेले पाहून घडलेला प्रकार उद्या सांगावा ह्या विचारांत सुरेखाताई बिछान्यावर पडल्या पण त्यांना झोप काही येईना. सारखा तो प्रसंग त्यांना आठवून दु:खाचे कढ येऊ लागले. महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने बोलताना आपल्याशीही असा अतिप्रसंग होऊ शकेल ह्याची अस्पष्टशीही कल्पना त्यांनी केली नव्हती. राजाभाऊंना हे कळले तर संताप तर येईलच पण वाईटही वाटेल हे त्या चांगलेच जाणून होत्या. दोघांचेही चित्त विचलित होणार होते पण ह्याबद्दल गप्प बसणे त्यांना रुचत नव्हते. ह्या असह्य प्रकाराबद्दल काय करावे, कोणास सांगावे हे त्यांना सुचत नव्हते. राजाभाऊंना उठवून झाला प्रकार सांगावा असे त्यांच्या मनात आले पण त्यांना शांतपणे झोपलेले पाहून त्यांनी विचार बदलला.अचानक त्यांना एक अनोखी कल्पना सुचली. संतोषभाऊंच्या मुलीला प्रियाला हा प्रकार सांगितल्यास ती समजूनही घेईल व भावाची कान उघडणीही करील ह्या विचारात असतानाच थकलेल्या सुरेखाताईंना झोपेने घेरले.
वैशुला सांभाळण्यासाठी व वरच्या घरकामासाठी मध्यमवयीन बाई मिळाल्याने सासूबाईंचा बराचसा व्याप कमी झालेला होता. सकाळीच घरांतली आवराआवर व स्वयंपाक करून त्या प्रचारासाठी निघणार होत्या. राजाभाऊ भुसावळच्या प्रचारावर निघत ते दिवसाचे जेवण तेथेच करीत. राजाभाऊ गेल्यावर त्यांनी संतोषभाऊंकडे फोन लावला. वहिनींना फोनवर प्रियाशी काम असल्याचे सांगितले; प्रियाला आपल्या घरी येण्याचा आर्जव करीत त्यांनी फोन ठेवला तेव्हा त्यांना जरा बरे वाटले.प्रियाला अडखळत त्यांनी आदल्या रात्री घडलेला प्रकार सांगितला. तिलाही भावाचा संताप आलेला होता पण दोघींनी सध्या संतोषभाऊंना किंवा वहिनींना झालेला प्रकार न सांगता प्रियाने फक्त भावाची हजेरी घ्यावी असे ठरले.**************************शेवटच्या सभांना वासूभाऊ, विचारे साहेब, राजाभाऊ, भराडे बाई, संतोषभाऊ ह्या सगळ्यांची हजेरी असणार होती. शेवटच्या तीन दिवसांत तालुक्यातल्या वेगवेगळ्या सोळा ठिकाणी सभांचे आयोजन केलेले होते. त्यानंतर मात्र प्रचार संपणार होता व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन मतांची भीक मागितली जाणार होती.ह्या शेवटच्या सभांपैकी एक सभा नानासाहेब पाटलांच्या वाड्यासमोर भरवण्यात आलेली होती. नानासाहेबांनी आपल्या सरपंचपदीच्या काळात मुलीच्या लग्नासाठी कडुनिंबांच्या दोन झाडांमध्ये हे पक्के व्यासपीठ बांधून घेतले होते ते अगदी वाड्याच्या समोर.व्यासपीठावरून बोलणारा माणूस पाटलांच्या पडवीतून स्पष्ट दिसे.... ह्याच स्टेजवर त्यांच्या दोघा पोरांनी अनेक वेळा तमाशातल्या बायकाही नाचवल्या होत्या.... नानासाहेबांच्या अनेक विजयी भाषणे येथूनच झालेली होती.... येथूनच अनेकांना शिक्षा सुनावण्यात आलेल्या होत्या..... अनेकांची घरेदारे उघड्यावर नेणारे निर्णय येथूनच घेण्यात आलेले होते.....
महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना आज येथूनच तोंड फुटणार होते....नानासाहेब पाटलांची मावसं सून आज ह्याच व्यासपीठावरून खणखणीत बोलणार होती....तालुक्यातल्या एकाधिकारशाही व सरंजामशाही बद्दल आज एका 'तेजस्विनी'चा आवाज सर्वत्र घुमणार होता....
व्यासपीठासमोरच्या भल्यामोठ्या पटांगणावर यावलकरांची तोबा गर्दी जमलेली होती. भाजमो च्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे वगनाट्याचा प्रयोग सुरुवातीला सादर केला त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनजागृतीच्या व सुरेखाताईंच्या सभा चांगल्याच गाजलेल्या होत्या. आजच्या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. वासुभाऊंपासून ते भराडे बाईंपर्यंत नेहमीची भाषणे झाली. सुरेखाताईंचे नांव पुकारण्यात आले व त्या तडफेने उभ्या राहिल्या.एक वेगळीच शांतता वातावरणात पसरली.आत्मविश्वासाने दमदार पावले टाकत सुरेखाताई माइक कडे चालू लागल्या.आपल्याच हाताने माइकची उंची स्वत:स साजेसी करीत व किंचित फुंकर मारून माइक चालू असल्याची खात्री करून त्या बोलू लागल्या......
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरहो, माझ्या प्रचारात राबणारे पक्ष कार्यकर्तेहो व माझ्या मतदार बंधुभगिनींनो, आपणांस आदरपूर्वक अभिवादन. ह्या व्यासपीठावरून हे भाषण सुरू करताना माझ्या भावना मी तुम्हांस कशा सांगू ?आपल्या गांवातली एक सून आज आपल्याजवळ स्वत:चे मनोगत मांडत आहे.खरंतर सुनेला उंबऱ्याच्या आंत ठेवण्यात प्रतिष्ठा समजली जाते....पण बंधुभगिनींनो, आपल्याच माणसांवर अत्याचार होत असतील तर कुठलीही सून गप्प बसून राहणारी नाही.घरातल्या गोष्टी ओट्यावर आणण्याची वेळ ह्या अत्याचारांमुळे आज आलेली आहे.....कितीही सासुरवास झाला तरी मुकाट्याने बसून सहन करण्याचे ते दिवस संपलेले आहेत......सुनाबाळींना गुलाम म्हणून वागवणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आज आलेली आहे.....
ह्या पंचक्रोशीतल्या थोरामोठांच्या कथा मी सून म्हणून येथे येण्यापूर्वीपासून मला तोंडपाठ आहेत.स्वातंत्र्याच्या मुक्तिसंग्रामात गेलेले बळी, यावलच्या कोर्टावर तिरंगा फडकवणारे कलम केलेले हात आज आठवा.....इथल्या सुनाबाळींचे पांढरे कपाळ व अनाथ झालेल्या पोरांचे आक्रोश आज आठवा.....येथल्या उसळ्या घेणाऱ्या रक्तांना थांबवण्यासाठी जखमांमध्ये गादीतला कापूस काढून कोंबल्याच्या त्या कथा आठवा.....भारत पाक युद्धात शहीद झालेले ते यावलचे वीर जवान आठवा.....व आजच्या युगातला त्या अट्रावलला घडलेला तो घृणास्पद प्रकार आठवा......मला कधी वाटलेही नव्हते की, भारत स्वातंत्र्य होऊनही एका नव्या क्रांतीचा लढा मला येथून सुरू करावा लागेल !
माझ्या बंधुभगिनींनो मी शिक्षिका म्हणून माझा संसार सुखात करीत होते.....पण माझ्या सासरच्या माणसांवर होत असलेले हे अत्याचार मला उघड्या डोळ्यांनी पाहवेनात.माझ्या शिक्षणाचा फक्त शिक्षिका म्हणून फायदा झाला, तर उपयोग काय ?......शिक्षणाने सुसंस्कृतपणा नाही आला, तर त्या शिक्षणाचा उपयोग तो काय ?......ह्या गांवासाठी मला काही करता नाही आले, तर माझा ह्या गांवाला उपयोग काय ?......मी ह्या वणव्यात उडी घेतेय ती माझ्या सासरच्या माणसांवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड फोडण्यासाठीच.....माझ्या भगिनींच्या प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी.....येथली एकाधिकारशाही कायमची नष्ट करण्यासाठी.....
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाल्याने एक नवी संधी आपल्या सर्वांसमोर चालत आलेली आहे.हा हक्क आता फक्त मतदानापुरता नाही तर निवडणुका लढवून आपल्या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा आहे....हा हक्क फक्त शेतात राबण्याचा नसून आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीवर आसूड ओढण्याचा आहे.....हा हक्क आपल्या अंगलटीला येणाऱ्या प्रत्येक मवाल्याच्या थोबाडीत देण्याचाही आहे.....
शेतात राबायचे, घरात राबायचे.धुणी-भांडी करायची, उष्टी-खरकटी काढायची.जेवायला समोर येईल ते उरले सुरलेले खायचे व नेसूला जे मिळेल त्याने आपली लाज झाकायची !हेच आजवर आपल्या गोरगरीब भगिनींना ठाऊक होते......पण आता मुलींच्या शिक्षणाचा सर्व भार सरकार उचलणार आहे.... त्यांना शाळा, महाविद्यालयांतून फी माफ करण्यात आलेली आहे,तेव्हा आता आपल्या मुलीला सुशिक्षित करणे हे प्रत्येक महिलेने आपले परम कर्तव्य समजावे.तिला भावंडे सांभाळत बसवण्यापेक्षा शाळेत पाठवून शिक्षण व चांगले संस्कार तिच्या बालमनावर घडवावे.
माझ्या भगिनींनो, महिलांना स्वयंरोजगारासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांचा योग्य फायदा उचला.टंकलेखन मशीन, शिलाई मशीन, कांडप-गिरणी, पिको फॉल मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन सारख्या मशीन सरकारतर्फे सबसीडी सह वाटल्या जातात. त्यावर प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व कुटुंबाचा उदर निर्वाह सन्मानाने करता येतो त्याचा महिलांनी फायदा घ्यावा.गरीब व विधवा स्त्रियांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान मिळते, मुलींना शिक्षणासाठी दूरवर जायचे असल्यास सायकल घेण्यासाठी अनुदान मिळते. सुर्यचुली, निर्धार चुली, खानावळ चालवण्यासाठी अनुदान, महिलांना मोफत चष्मे व विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन सरकार तर्फे करण्यात येते.
ह्या पूर्वीच्या सरपंचांनी व पंचायतीच्या अध्यक्षांनी अनुदाने स्वत:च्या खिशांत घातली त्याचा जाब आता मी त्यांना विचारणार आहे.....महिलांच्या नावाने पैशांची उचल करून तमाशाचे फड नाचवले त्याचे हिशेब आता त्यांना द्यावे लागणार आहेत......महिलांच्या अश्रूंचे मोल त्यांना येथेच द्यावे लागणार आहे.....
माझ्या भगिनींनो आता घाबरण्याचे कारण नाही..... आता आपल्या ह्या सख्या, आपल्या भगिनी आपल्यासाठी लढा देतील.आपल्या अन्यायाचा जाब विचारणारा पक्ष आज निर्माण झालेला आहे,तो आपले अश्रू वाया जाऊ देणार नाही त्याचे मोल आपल्याला मिळेलच.....'जनजागृती' पक्ष आपल्या सहकारी 'भाजमो' पक्षासोबत महिलांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढील....ही मी माझ्या पक्षातर्फे आपल्याला ग्वाही देते.
ह्याच व्यासपीठावरून नानासाहेब पाटलांनी अनेक अन्याय केले.....येथल्या गरीब जनतेच्या जमिनी घशांत घालणारे निर्णय दिले.......निर्मल पाटलांना मारून रेल्वेखाली फेकण्याचे कट कारस्थान ह्याच ठिकाणी झाले.....येथेच तमाशातल्या बायका नाचवल्या तर गांवातल्या बायका नागवल्या गेल्या......गोरगरीबांना वाड्यावर बोलवून चाबकाने फोडण्यात आले, मुस्लिमांच्या घरादारांवरून नांगर फिरवले....ह्या गोरगरीबांवरच्या अत्याचारांचा व अश्रूंचा जाब आज मला हवाय.......अनेक शासकीय योजनांचे पैसे घशात घातले त्यांचा हिशेब मला हवाय......गोरगरीबांच्या जमिनी बळकावल्या, त्यांना देशोधडीला लावले त्याचा जाब मला हवाय.....
ह्या नानासाहेब पाटलांचे अत्याचारी राज्य संपवण्याचा आज निर्धार करा....ह्या तुळशीच्या बागेत उगवलेल्या गांज्याच्या रोपटाला उखडून फेकण्याचा निर्धार आज करा....जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत 'जनजागृती' पक्षाच्या 'टांगा' ह्या निशाणीवर शिक्का मारून,विकास आघाडीला जोरदार 'धक्का' द्यायचा निर्धार आज करा....... ही माझी कळकळीची विनंती आहे.एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.... जयहिंद ! जय महाराष्ट्र ! "
अखंड टाळ्यांच्या गजरासोबत 'सुरेखाताई झिंदाबाद, जनजागृती पक्षाचा विजय असो' अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या.....
..........लांब कुठेतरी, एका दगडावर एकटे बसलेल्या वैद्य बुवांच्या डोळ्यांत आलेले आंनदाश्रू कुणी पाहिलेही नव्हते !
खेड्यातल्या प्रचार सभांसाठी दोन जीपड्या व १४/१५ कार्यकर्त्यांसोबत त्यांना जावे लागे. खडक्यातल्या प्रचारसभेसोबत माहेजी, वरणगांव, मुक्ताईनगर वगैरे गावांतला प्रचार एक दिवस ठरला. नेहमीप्रमाणे जीपमध्ये पुढे त्या व अजून दोन महिला कार्यकर्त्या तर मागे तरुणांचा तांडा व दुसऱ्या गाडीत इतर काही पोरांबरोबर आज प्रियांकही आलेला दिसला. त्याला ओळखीचे एक स्मितहास्य देत त्या गाडीत बसल्या. ह्या मतदारसंघांत वासूभाऊंनी बरेच कार्य केले होते. त्यांना प्रचारसभेला न नेता त्यांच्या वयाचा मान ठेवण्याची गळ मतदारांना घालायची ठरले. प्रथमच सुरेखाताईंनी भाषणांचा सर्व भार स्वत:वर उचललेला होता. दोन चारशे जणांच्या धनगरवस्त्यांपासून वरणगांवातल्या बसस्टॅंड समोरच्या जंगी सभांतून त्यांनी दणदणीत भाषणे केली.महिलांच्या समस्या, शेतकरी महिलांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार, दारूबंदी इत्यादी प्रत्येक घरगुती समस्यांवर सुरेखाताई आवर्जून बोलत. "ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत येथले स्थानिक प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत तेव्हा त्यावरच जास्त भर दे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महिला समस्यांवर बोलू नकोस कारण त्यात येथल्या बायकांना काहीही रस नाही" हा राजाभाऊंचा इशारा त्यांनी बरोबर अमलांत आणलेला होता. त्यामुळे जेव्हा भाषण संपल्यावर त्या बायकांशी थेट भेटून संवाद साधत तेव्हा त्यांच्या भाषणाची पावती त्यांना लगेच मिळे.खेड्याखेड्यांतून सुरेखाताईंना चांगला प्रतिसाद मिळत होता. पुरूष वर्गही त्यांच्या भाषणाची खिल्ली न उडवता, मास्तरीण बाईचे भाषण मन लावून ऐकत. भराडे बाईंइतक्या टाळ्या मिळत नसल्या तरी मोहिनी सारख्या शिट्ट्याही पडत नव्हत्या. एक शोभेची किंवा बोलभांड बाई कशी असते ते बघण्याऐवजी मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला गाव~खेड्यातली लोकं गर्दी करीत होती.
मुक्ताईनगरची त्या दिवसातली शेवटची प्रचारसभा संपली तेव्हा रात्रीचे आठ वाजत आलेले होते. स्थानिक महिलांसोबत फिरत त्यांनी घराघरांतून थोडा प्रचारही करून घेतला. सोबत आलेला भाजमोच्या तरुणांच्या तांड्याने बसवलेले वगनाट्य व्यासपीठावर सुरू होते. नानासाहेब पाटलांचे व त्यांच्या दिवट्या चिरंजीवाचे अत्याचार हा वगनाट्यातला छुपा विषय होता. वगनाट्याला पडत असलेल्या लोकांच्या टाळ्या व शिट्ट्यांची आता चांगलीच सवय झालेली होती. दोन चार तरुण पोरांबरोबर प्रियांकही घरोघरी प्रचार करण्यासाठी सोबत घुटमळत होता. वगनाट्य संपले तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजलेले होते. तिथल्याच एका कार्यकर्त्याच्या घरी झुणका भाकरीच्या साध्या जेवणाचा कार्यक्रम आटोपला व तांडा घरी परतण्यासाठी निघाला.मध्येच ऍक्सल का काय तुटला म्हणून सुरेखा ताईंचं जीपडं बंद पडले. मनातल्या मनात त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. शेवटी दुसऱ्या जीपड्यांत बायका व मावतील तितकी मंडळी कोंबून बसवून न्यायच ठरलं. पाच सहा जण मागेच राहिली. परतीच्या प्रवासांत थकलेल्या सुरेखाताईंना झोपेची ग्लानी चढत होती. रस्त्यातल्या खड्ड्यांतून बसणारे आचके डोकं वर आपटवत होते. आधारासाठी जेमतेम समोरचा दांडा धरून त्या बसल्या होत्या. उजवीकडे शेजारी बसलेल्या दोघी बायका प्रत्येक खड्ड्यागणिक अंगावर आदळत होत्या. डावीकडे बसलेला प्रियांक जवळपास जीपच्या बाहेरच लोंबकळत होता. आधारासाठी त्याने मागच्या सीटवर ठेवलेला हात सारखा सुरेखाताईंच्या खांद्यावर घसरत होता म्हणून त्या थोड्या पुढे सरकल्या, इतक्याश्या जागेतही थोडी जागा बनवून प्रियांक मध्ये सरकल्याचे त्यांना जाणवले.त्यानंतर जे घडतं गेले तो प्रकारच त्यांच्यासाठी भयावह होता. प्रियांकने आधारासाठी ठेवलेला मागचा हात सरळ उजव्या खाकेत सरकवून त्यांना स्वत:कडे ओढायला सुरुवात केली. एक दोन वेळा तोंडाने 'चक्क' असा आवाज करीत त्या थोड्या मध्ये सरकल्या पण त्यामुळे प्रियांकसाठी सरकायला अजूनच जागा तयार झाली. शेवटी 'प्रियांक, नीट बस' अस सांगूनही तो बधेना. त्याच्या मनातले घाणेरडे विचार त्याच्या अंगलटीला येणाऱ्या कृतीतून स्पष्ट कळत होते. नशिबाने घर आले व सुरेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला. मागे वळूनही न पाहता तरतर त्या घराकडे चालू लागल्या.त्यांच्या अंगातल्या घामाच्या धारा व डोळ्यांतला संताप बघून राजाभाऊही क्षणभर अवाक झाले."काय झाले गं ?" ह्या त्यांच्या प्रश्नाला "अंघोळ करून येते, मग सांगते." इतकेच उत्तर देत त्या सरळ न्हाणीघरांत शिरल्या.
उजवी खाक खसखसून घासली तरी प्रियांकने तेथे केलेला तो घाणेरडा स्पर्श त्यांना अजूनही जाणवत होता.*****************************सुहास पाटलांच्या मनाजोगती एकुलती एक रावेरची जागा त्यांच्या साडूला मिळाली. त्या जागेवरून नानासाहेबांच्या समोरच दोघा भावांत चांगलीच जुंपली. रावेरला विरोधी पक्षातर्फे भाजमो चा नवीन उमेदवार होता. ह्या रणधुमाळीतली विकास आघाडीची तीच जागा 'सेफ सीट' मानली जात होती. जनजागृती व भाजमो ची युती झाल्यानंतर भाजमो च्या वाट्याला आलेल्या रावेरच्या ह्या जागेवरून सुहास पाटलांचा साडू राजू यावलकर उभा होता त्याला सरळ लढत होती ती भाजमोच्या कॉलेज कुमार नवख्या अजय फालकची.तालुक्यातल्या बाकी सर्व जागांवर सुनीलच्या माणसांना अपार कष्ट घ्यावे लागणार होते. नानासाहेब पाटील जातीने स्वत: प्रचारात उतरले होते. तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या समर्थकांना पूर्ण प्रदेश पिंजून काढण्याची सक्त ताकीद देण्यात येत होती. कुठेही विरोधकांनी डोके वर काढू नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा नानासाहेबांनी कामाला जुंपलेली होती. राजेंद्र गाजरेनेही स्वत:ची कुमक सुनीलसाठी कामाला लावलेली होती. मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडलेल्या पंचायतीच्या ८ अशा ११ जागांसाठी विकास आघाडीने स्वत:ची असलेली नसलेली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून लढत देण्याच्या तयारी केली होती.विचारेसाहेबां समोर सुनीलची सरळ लढत होती. फेगडेंची लढत वासूभाऊंशी होती तर मोहिनी इंगळे समोर पाटलांची मावसं सून सुरेखा जाधव उभी होती. अट्रावलची जागा नानासाहेबांच्या हातून गेल्यातच जमा होती. तर निंभोरा, सावदा येथे मिळालेल्या उमेदवार विरोधी पक्षांच्या महिला उमेदवारांच्या समोर मिळमिळीतच होत्या. उरलेल्या ५ जागांवर संमिश्र यश जमेस धरले तरी ह्यावेळी तालुक्यात पक्षाला व पर्यायाने नानासाहेबांना जोरदार फटका पडणार असल्याचे जवळ जवळ निश्चित होते. सुनील पाटलाच्या रागाचे कारणही तेच होते. जवळच्या साथीदारांना सहजसाध्य मतदारसंघ रावेरचा होता व तोच सुहासच्या साडूला द्यावा लागलेला होता.प्रचाराचा शेवट जवळ येत होता. शेवटची रणधुमाळी सुरू होत होती. सभा गाजू लागलेल्या होत्या. गांवात शेवटच्या सभा नानासाहेब, राजेंद्र, सुनील व सुहासने ठरवल्या होत्या. पूर्ण ताकद शेवटच्या घावासाठी राखून ठेवण्यात येणार होती.***************************राजाभाऊंना झोपलेले पाहून घडलेला प्रकार उद्या सांगावा ह्या विचारांत सुरेखाताई बिछान्यावर पडल्या पण त्यांना झोप काही येईना. सारखा तो प्रसंग त्यांना आठवून दु:खाचे कढ येऊ लागले. महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने बोलताना आपल्याशीही असा अतिप्रसंग होऊ शकेल ह्याची अस्पष्टशीही कल्पना त्यांनी केली नव्हती. राजाभाऊंना हे कळले तर संताप तर येईलच पण वाईटही वाटेल हे त्या चांगलेच जाणून होत्या. दोघांचेही चित्त विचलित होणार होते पण ह्याबद्दल गप्प बसणे त्यांना रुचत नव्हते. ह्या असह्य प्रकाराबद्दल काय करावे, कोणास सांगावे हे त्यांना सुचत नव्हते. राजाभाऊंना उठवून झाला प्रकार सांगावा असे त्यांच्या मनात आले पण त्यांना शांतपणे झोपलेले पाहून त्यांनी विचार बदलला.अचानक त्यांना एक अनोखी कल्पना सुचली. संतोषभाऊंच्या मुलीला प्रियाला हा प्रकार सांगितल्यास ती समजूनही घेईल व भावाची कान उघडणीही करील ह्या विचारात असतानाच थकलेल्या सुरेखाताईंना झोपेने घेरले.
वैशुला सांभाळण्यासाठी व वरच्या घरकामासाठी मध्यमवयीन बाई मिळाल्याने सासूबाईंचा बराचसा व्याप कमी झालेला होता. सकाळीच घरांतली आवराआवर व स्वयंपाक करून त्या प्रचारासाठी निघणार होत्या. राजाभाऊ भुसावळच्या प्रचारावर निघत ते दिवसाचे जेवण तेथेच करीत. राजाभाऊ गेल्यावर त्यांनी संतोषभाऊंकडे फोन लावला. वहिनींना फोनवर प्रियाशी काम असल्याचे सांगितले; प्रियाला आपल्या घरी येण्याचा आर्जव करीत त्यांनी फोन ठेवला तेव्हा त्यांना जरा बरे वाटले.प्रियाला अडखळत त्यांनी आदल्या रात्री घडलेला प्रकार सांगितला. तिलाही भावाचा संताप आलेला होता पण दोघींनी सध्या संतोषभाऊंना किंवा वहिनींना झालेला प्रकार न सांगता प्रियाने फक्त भावाची हजेरी घ्यावी असे ठरले.**************************शेवटच्या सभांना वासूभाऊ, विचारे साहेब, राजाभाऊ, भराडे बाई, संतोषभाऊ ह्या सगळ्यांची हजेरी असणार होती. शेवटच्या तीन दिवसांत तालुक्यातल्या वेगवेगळ्या सोळा ठिकाणी सभांचे आयोजन केलेले होते. त्यानंतर मात्र प्रचार संपणार होता व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन मतांची भीक मागितली जाणार होती.ह्या शेवटच्या सभांपैकी एक सभा नानासाहेब पाटलांच्या वाड्यासमोर भरवण्यात आलेली होती. नानासाहेबांनी आपल्या सरपंचपदीच्या काळात मुलीच्या लग्नासाठी कडुनिंबांच्या दोन झाडांमध्ये हे पक्के व्यासपीठ बांधून घेतले होते ते अगदी वाड्याच्या समोर.व्यासपीठावरून बोलणारा माणूस पाटलांच्या पडवीतून स्पष्ट दिसे.... ह्याच स्टेजवर त्यांच्या दोघा पोरांनी अनेक वेळा तमाशातल्या बायकाही नाचवल्या होत्या.... नानासाहेबांच्या अनेक विजयी भाषणे येथूनच झालेली होती.... येथूनच अनेकांना शिक्षा सुनावण्यात आलेल्या होत्या..... अनेकांची घरेदारे उघड्यावर नेणारे निर्णय येथूनच घेण्यात आलेले होते.....
महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना आज येथूनच तोंड फुटणार होते....नानासाहेब पाटलांची मावसं सून आज ह्याच व्यासपीठावरून खणखणीत बोलणार होती....तालुक्यातल्या एकाधिकारशाही व सरंजामशाही बद्दल आज एका 'तेजस्विनी'चा आवाज सर्वत्र घुमणार होता....
व्यासपीठासमोरच्या भल्यामोठ्या पटांगणावर यावलकरांची तोबा गर्दी जमलेली होती. भाजमो च्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे वगनाट्याचा प्रयोग सुरुवातीला सादर केला त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनजागृतीच्या व सुरेखाताईंच्या सभा चांगल्याच गाजलेल्या होत्या. आजच्या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. वासुभाऊंपासून ते भराडे बाईंपर्यंत नेहमीची भाषणे झाली. सुरेखाताईंचे नांव पुकारण्यात आले व त्या तडफेने उभ्या राहिल्या.एक वेगळीच शांतता वातावरणात पसरली.आत्मविश्वासाने दमदार पावले टाकत सुरेखाताई माइक कडे चालू लागल्या.आपल्याच हाताने माइकची उंची स्वत:स साजेसी करीत व किंचित फुंकर मारून माइक चालू असल्याची खात्री करून त्या बोलू लागल्या......
"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरहो, माझ्या प्रचारात राबणारे पक्ष कार्यकर्तेहो व माझ्या मतदार बंधुभगिनींनो, आपणांस आदरपूर्वक अभिवादन. ह्या व्यासपीठावरून हे भाषण सुरू करताना माझ्या भावना मी तुम्हांस कशा सांगू ?आपल्या गांवातली एक सून आज आपल्याजवळ स्वत:चे मनोगत मांडत आहे.खरंतर सुनेला उंबऱ्याच्या आंत ठेवण्यात प्रतिष्ठा समजली जाते....पण बंधुभगिनींनो, आपल्याच माणसांवर अत्याचार होत असतील तर कुठलीही सून गप्प बसून राहणारी नाही.घरातल्या गोष्टी ओट्यावर आणण्याची वेळ ह्या अत्याचारांमुळे आज आलेली आहे.....कितीही सासुरवास झाला तरी मुकाट्याने बसून सहन करण्याचे ते दिवस संपलेले आहेत......सुनाबाळींना गुलाम म्हणून वागवणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आज आलेली आहे.....
ह्या पंचक्रोशीतल्या थोरामोठांच्या कथा मी सून म्हणून येथे येण्यापूर्वीपासून मला तोंडपाठ आहेत.स्वातंत्र्याच्या मुक्तिसंग्रामात गेलेले बळी, यावलच्या कोर्टावर तिरंगा फडकवणारे कलम केलेले हात आज आठवा.....इथल्या सुनाबाळींचे पांढरे कपाळ व अनाथ झालेल्या पोरांचे आक्रोश आज आठवा.....येथल्या उसळ्या घेणाऱ्या रक्तांना थांबवण्यासाठी जखमांमध्ये गादीतला कापूस काढून कोंबल्याच्या त्या कथा आठवा.....भारत पाक युद्धात शहीद झालेले ते यावलचे वीर जवान आठवा.....व आजच्या युगातला त्या अट्रावलला घडलेला तो घृणास्पद प्रकार आठवा......मला कधी वाटलेही नव्हते की, भारत स्वातंत्र्य होऊनही एका नव्या क्रांतीचा लढा मला येथून सुरू करावा लागेल !
माझ्या बंधुभगिनींनो मी शिक्षिका म्हणून माझा संसार सुखात करीत होते.....पण माझ्या सासरच्या माणसांवर होत असलेले हे अत्याचार मला उघड्या डोळ्यांनी पाहवेनात.माझ्या शिक्षणाचा फक्त शिक्षिका म्हणून फायदा झाला, तर उपयोग काय ?......शिक्षणाने सुसंस्कृतपणा नाही आला, तर त्या शिक्षणाचा उपयोग तो काय ?......ह्या गांवासाठी मला काही करता नाही आले, तर माझा ह्या गांवाला उपयोग काय ?......मी ह्या वणव्यात उडी घेतेय ती माझ्या सासरच्या माणसांवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड फोडण्यासाठीच.....माझ्या भगिनींच्या प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी.....येथली एकाधिकारशाही कायमची नष्ट करण्यासाठी.....
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाल्याने एक नवी संधी आपल्या सर्वांसमोर चालत आलेली आहे.हा हक्क आता फक्त मतदानापुरता नाही तर निवडणुका लढवून आपल्या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा आहे....हा हक्क फक्त शेतात राबण्याचा नसून आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीवर आसूड ओढण्याचा आहे.....हा हक्क आपल्या अंगलटीला येणाऱ्या प्रत्येक मवाल्याच्या थोबाडीत देण्याचाही आहे.....
शेतात राबायचे, घरात राबायचे.धुणी-भांडी करायची, उष्टी-खरकटी काढायची.जेवायला समोर येईल ते उरले सुरलेले खायचे व नेसूला जे मिळेल त्याने आपली लाज झाकायची !हेच आजवर आपल्या गोरगरीब भगिनींना ठाऊक होते......पण आता मुलींच्या शिक्षणाचा सर्व भार सरकार उचलणार आहे.... त्यांना शाळा, महाविद्यालयांतून फी माफ करण्यात आलेली आहे,तेव्हा आता आपल्या मुलीला सुशिक्षित करणे हे प्रत्येक महिलेने आपले परम कर्तव्य समजावे.तिला भावंडे सांभाळत बसवण्यापेक्षा शाळेत पाठवून शिक्षण व चांगले संस्कार तिच्या बालमनावर घडवावे.
माझ्या भगिनींनो, महिलांना स्वयंरोजगारासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांचा योग्य फायदा उचला.टंकलेखन मशीन, शिलाई मशीन, कांडप-गिरणी, पिको फॉल मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन सारख्या मशीन सरकारतर्फे सबसीडी सह वाटल्या जातात. त्यावर प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व कुटुंबाचा उदर निर्वाह सन्मानाने करता येतो त्याचा महिलांनी फायदा घ्यावा.गरीब व विधवा स्त्रियांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान मिळते, मुलींना शिक्षणासाठी दूरवर जायचे असल्यास सायकल घेण्यासाठी अनुदान मिळते. सुर्यचुली, निर्धार चुली, खानावळ चालवण्यासाठी अनुदान, महिलांना मोफत चष्मे व विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन सरकार तर्फे करण्यात येते.
ह्या पूर्वीच्या सरपंचांनी व पंचायतीच्या अध्यक्षांनी अनुदाने स्वत:च्या खिशांत घातली त्याचा जाब आता मी त्यांना विचारणार आहे.....महिलांच्या नावाने पैशांची उचल करून तमाशाचे फड नाचवले त्याचे हिशेब आता त्यांना द्यावे लागणार आहेत......महिलांच्या अश्रूंचे मोल त्यांना येथेच द्यावे लागणार आहे.....
माझ्या भगिनींनो आता घाबरण्याचे कारण नाही..... आता आपल्या ह्या सख्या, आपल्या भगिनी आपल्यासाठी लढा देतील.आपल्या अन्यायाचा जाब विचारणारा पक्ष आज निर्माण झालेला आहे,तो आपले अश्रू वाया जाऊ देणार नाही त्याचे मोल आपल्याला मिळेलच.....'जनजागृती' पक्ष आपल्या सहकारी 'भाजमो' पक्षासोबत महिलांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढील....ही मी माझ्या पक्षातर्फे आपल्याला ग्वाही देते.
ह्याच व्यासपीठावरून नानासाहेब पाटलांनी अनेक अन्याय केले.....येथल्या गरीब जनतेच्या जमिनी घशांत घालणारे निर्णय दिले.......निर्मल पाटलांना मारून रेल्वेखाली फेकण्याचे कट कारस्थान ह्याच ठिकाणी झाले.....येथेच तमाशातल्या बायका नाचवल्या तर गांवातल्या बायका नागवल्या गेल्या......गोरगरीबांना वाड्यावर बोलवून चाबकाने फोडण्यात आले, मुस्लिमांच्या घरादारांवरून नांगर फिरवले....ह्या गोरगरीबांवरच्या अत्याचारांचा व अश्रूंचा जाब आज मला हवाय.......अनेक शासकीय योजनांचे पैसे घशात घातले त्यांचा हिशेब मला हवाय......गोरगरीबांच्या जमिनी बळकावल्या, त्यांना देशोधडीला लावले त्याचा जाब मला हवाय.....
ह्या नानासाहेब पाटलांचे अत्याचारी राज्य संपवण्याचा आज निर्धार करा....ह्या तुळशीच्या बागेत उगवलेल्या गांज्याच्या रोपटाला उखडून फेकण्याचा निर्धार आज करा....जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत 'जनजागृती' पक्षाच्या 'टांगा' ह्या निशाणीवर शिक्का मारून,विकास आघाडीला जोरदार 'धक्का' द्यायचा निर्धार आज करा....... ही माझी कळकळीची विनंती आहे.एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.... जयहिंद ! जय महाराष्ट्र ! "
अखंड टाळ्यांच्या गजरासोबत 'सुरेखाताई झिंदाबाद, जनजागृती पक्षाचा विजय असो' अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या.....
..........लांब कुठेतरी, एका दगडावर एकटे बसलेल्या वैद्य बुवांच्या डोळ्यांत आलेले आंनदाश्रू कुणी पाहिलेही नव्हते !
तेजस्विनी-११
"तुला लाज कशी नाही वाटली असले प्रकार करताना ? कमीत कमी आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार तरी करायचा " प्रिया आपल्या भावाची बिनपाण्याने हजामत करत होती. समोर प्रियांक मान खाली घालून उभा होता. तर मालती वहिनी बेडच्या कोपऱ्यावर हताशपणे बसून मुलाकडे बघत होत्या. प्रियाने झाला प्रकार आईपासून लपवून न ठेवण्याचा निर्णय घेतला होता व ते एका अर्थी बरेच झाले होते. प्रियाला दुर्लक्षीत करण्याइतपत प्रियांकचे वय नक्कीच होते."जरा विचार कर; उद्या राजाभाऊंनी प्रियाला असली वागणूक दिली तर तुला कसे वाटेल " मालती वहिनी उसळून म्हणाल्या."सर असे वागायला, उकिरड्यावरचे शेण थोडंच खातात" प्रिया फणकाऱ्याने बोलली."आज पासून सुरेखा वहिनींच्या आजू बाजूने फिरकलास किंवा दुसऱ्या कुठल्याही बाईकडे मान वर करून बघितलेस तर घराबाहेर हाकलून देईन" मालती वहिनींनी त्याला बजावले."बाबांना कळले तर चाबकाने फोडून काढतील तुला.... असले प्रकार करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष दे नाहीतर त्या पाटलांच्या पोरांसारखा नावारूपाला येशील" प्रिया लहान भावावर तोंडसुख घेत होती. दोघाही मायलेकींना प्रियांकने केलेल्या प्रकाराची लाज वाटत होती."तुझ्या ऐवजी आता मी जाऊन सुरेखाताईंची माफी मागणार आहे" मालती वहिनी बोलल्या."हो आई, तूच माफी माग म्हणजे त्यांना जरा धीर येईल व कळेलही की ह्या दिवट्याला आपण पाठीशी घालणार नाही ते " प्रिया म्हणाली."जा आता, तोंड काळ कर आमच्या समोरून" ह्या मालती वहिनींच्या वाक्यावर प्रियांकने मान खाली घालून चालायला सुरुवात केली.मालती वहिनींनी सुरेखा ताईंशी त्यावर बोलून त्यांची समजूत काढण्याचे ठरले व मग तो विषय तेथेच संपला होता.....एका स्त्रीला ह्या जगात कसले अनुभव घ्यावे लागतात ह्या विचारांनी प्रियाचे अंग नकळत शहारले.********************कालच्या दणदणीत सभे नंतर जाहीर सभांचा व प्रचाराचा काळ संपला होता. आचारसंहिता अजूनच कडकपणे राबवली जाणार होती. फक्त वैयक्तिक भेटीगाठींमार्फत प्रचार मोहीम राबवली जाणार होती. भा.ज.मो.च्या तरुण कल्पक कार्यकर्त्यांनी मात्र पथनाट्ये बसवून लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करायला सुरुवात केली होती. सुनील पाटलाने त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला परंतू हा 'कुठल्याही पक्षाचा प्रचार नसून, आम्ही मतदारांना उत्स्फूर्त मतदान करण्याचे आव्हान करीत आहोत' असे सांगून भा.ज.मो. ने त्या आक्षेपाची पार बोळवण करून टाकली.मतदार राजा सुज्ञ होता, कोणास काय म्हणायचे आहे, ते तो चांगलाच जाणून होता......
'आज विश्रांती घेऊ व थोडा वेळ वैशुला देऊ' असा विचार करून सुरेखाताई घरीच होत्या. भुसावळला आज शेवटची प्रचारसभा होती म्हणून राजाभाऊ प्रचारासाठी संतोषभाऊ व इतर कार्यकर्त्यांसोबत तिकडे गेले होते. गेल्या दहा बारा दिवसाची धावपळ आज जाणवत नव्हती म्हणून थोड्याश्या आळसावलेल्या सुरेखाताई घराच्या पायरीवर बसून अंगणात खेळणाऱ्या वैशुकडे पाहत होत्या."माज्या आईलाच मते द्या" असे बोबडे बोल बोलत ती आजूबाजूंच्या घरांसमोरून ओरडत जात होती. बरोबरीला दोन तीन समवयस्क पोरं, पोरी कार्यकर्ते म्हणून घेऊन तिचा रंगात आलेला खेळ त्या पाहत होत्या."सूनबाई, घरीच आहेस नां, तोवर मी पटकन शालूच्या आईकडे जाऊन येते" राजाभाऊंच्या आई म्हणाल्या."हो, मी चार पर्यंत घरीच आहे आज आई" त्यांनी संमतिदर्शक मान हालवतं म्हटले व स्वयंपाक पाण्याचा लवाजमा बघायला स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला तोवर सासूबाई बाहेर पडल्या होत्या.
दाराबाहेर रिक्शाचा आवाज आलेला पाहून सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर आल्या व बघतात तर मालती वहिनी रिक्षावाल्याला पैसे देत बाहेर पाठमोऱ्या उभ्या होत्या. त्यांना पाहताच पटकन त्या बैठकीच्या खोलीतली आवराआवर करू लागल्या इतक्यात वैशुने त्यांच्याकडे जाऊन लाडेलाडे त्यांना 'माज्या आईला मतं द्या' चा नारा पुकारलेला त्यांनी ऐकला. हंसत हंसत त्या मालतीवहिनींच्या स्वागतासाठी दारापर्यंत गेल्या."काय सुंदर आणी दणदणीत भाषण केलेस तू सुरेखा काल, साफ दाणादाण उडवून लावली पाटलांची" मालती वहिनी कौतुकाने म्हणू लागल्या."आपले व संतोषभाऊंचे आशीर्वाद सार्थकी लागले म्हणायचे की," त्यांनी विनयाने म्हटले."माझे कसले आशीर्वाद घेऊन बसलीस, तू जात्याच हुशार; म्हणून छान बोललीस हो" वहिनींचा कौतुकाचा भर काही ओसरायला तयार नव्हता."बसा हं, मी पाणी आणते" त्या स्वयंपाकघराकडे जायला वळल्या. पाणी दिल्यावर "आज इकडे कसा दौरा वहिनी ?" सुरेखाताईंनी विचारले."खास तुला भेटायला आले; तुझी माफी मागायची होती" मालतीवहिनींच्या डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.एक क्षण गोंधळून जाऊन सुरेखाताई त्यांच्याकडे बघतच राहिल्या."माझ्या कार्ट्याने जो अतिप्रसंग केला त्याबद्दल मी क्षमा मागते सुरेखा तुझी" मालती वहिनी दोन्ही हात जोडीत म्हणाल्या.काय बोलावे हे काही क्षण सुरेखाताईंना कळेचना...."प्रियांक कडून अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे काय करावे हे मलाही कळेना वहिनी, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर थोबाडीतच ठेवून दिली असती मी." त्या पटकन बोलल्या."तीच चूक केलीस सुरेखा तू, सर्वांसमक्ष दोन चढवून दिल्या असत्या तर बरं झालं असत" वहिनी म्हणाल्या."पण त्यामुळे प्रश्न सुटला नसता वहिनी; चिघळला असता. काही वेळा तरुण रक्ताला डिवचल्याने ते अजूनच उफाळून वर येते. प्रियाने एकटीने समजावले असते तरी बराच परिणाम झाला असता.""पण मला कळले हेही बरे झाले बाई, आपली मुले आपल्या अपरोक्ष बाहेर काय धंदे करतात हे घरात बसून कळणे कठीणच आहे" मालती वहिनी म्हणाल्या."वहिनी, तुमच्या जागी मी असते तरी माझीही अशीच अवस्था झाली असती. मलाही इतकेच वाईट वाटले असते....." सुरेखाताई त्यांना समजावण्याच्या सुरांत बोलल्या.मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मालती वहिनी वारंवार माफी मागत घरी जायला निघाल्या.त्या गेल्यावर बराच वेळ सुरेखा ताई पायरीवर एकट्याच शून्यांत नजर लावून बसून होत्या.... एका मातेला तिने न केलेल्या गुन्ह्या बद्दल माफी मागायला लागल्याचे त्यांनाही दु:ख झाले होते. आजकालच्या सामाजिक अध:पतनाचे वैषम्य त्यांना चांगलेच जाणवून गेले.*************************************सुरेखा ताईंनी दुपारी वाड्यातल्या बायकांना जमवून गल्लीबोळांतून हळदी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या निमित्ताने मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत आपला मतदारांशी संपर्क राहील अशी अटकळ त्यांनी बांधली होती. सायंकाळी उशीराने राजाभाऊ घरी परते पर्यंत बराचसा भाग त्यांनी पादाक्रांत केलेला होता.आजचा दिवस तर त्यांचा होता पण रात्र वैऱ्याची होती. रात्री धोका जास्त होता...... व तो झालाच !पैशांनी मत फोडण्यास सुरुवात झाली. घरोघर दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटली गेली. जळगांवहून आलेले राजेंद्र गाजरेंचे कार्यकर्ते रात्रभर मोठमोठ्या थैल्या घेऊन फिरत होते. संतोषभाऊंनी पोलिस स्टेशनला फोन लावला पण बोरसे साहेबांना तातडीच्या कामानिमित्त जळगांवला जावे लागल्याचे त्यांना फोनवर सांगण्यात आले. डिसीपी हेगडेंचा डाव उजवा पडल्याचे भाऊंच्या लक्षात आले. आता मतदार राजाच तो काय वाली असे समजून पक्षाचे सगळेच कार्यकर्ते गप्प बसले. सुरेखा ताईंचा राग मात्र आतल्या आत धुमसत होता.**************************************मतदानाचा दिवस उगवला.... केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या. आजचे मतदान थोडे जास्तच होणार असल्याच्या अटकळी पत्रकार लोक सकाळपासून करू लागले. खेड्यापाड्यांवरून समाधानकारक मतदान होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही ठिकाणी नानासाहेब पाटलांची मंडळी गटागटाने माणसांना बायांना मतदानासाठी घराबाहेर काढीत असल्याच्या बातम्या आल्या. काल परवा पर्यंत आपल्या सोबत असणारी असलेली आसपासची मंडळी आपली नजर चुकवत असल्याचा भास सुरेखाताईंना होऊ लागला. त्या मनातून घाबरल्या..... राजाभाऊंनाही बदलत्या परिस्थितीची जाणीव झाली, एक राजकीय निरीक्षक म्हणून ह्या सगळ्यांचा अर्थ त्यांना कळत होता. दिवसभर कुंद व विचित्र वातावरण पसरलेले होते.... मतदान शांततेत पार पडल्याच्या बातम्या सायंकाळी सह्याद्री वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात आल्या. अट्रावलला होत असलेल्या मतदानावर डिसीपी हेगडे जातीने लक्ष ठेवून असल्याचा खास उल्लेख केला गेला तेव्हा सुरेखाताई उपहासाने व तुच्छतेने हसल्या.***********************************
'आज विश्रांती घेऊ व थोडा वेळ वैशुला देऊ' असा विचार करून सुरेखाताई घरीच होत्या. भुसावळला आज शेवटची प्रचारसभा होती म्हणून राजाभाऊ प्रचारासाठी संतोषभाऊ व इतर कार्यकर्त्यांसोबत तिकडे गेले होते. गेल्या दहा बारा दिवसाची धावपळ आज जाणवत नव्हती म्हणून थोड्याश्या आळसावलेल्या सुरेखाताई घराच्या पायरीवर बसून अंगणात खेळणाऱ्या वैशुकडे पाहत होत्या."माज्या आईलाच मते द्या" असे बोबडे बोल बोलत ती आजूबाजूंच्या घरांसमोरून ओरडत जात होती. बरोबरीला दोन तीन समवयस्क पोरं, पोरी कार्यकर्ते म्हणून घेऊन तिचा रंगात आलेला खेळ त्या पाहत होत्या."सूनबाई, घरीच आहेस नां, तोवर मी पटकन शालूच्या आईकडे जाऊन येते" राजाभाऊंच्या आई म्हणाल्या."हो, मी चार पर्यंत घरीच आहे आज आई" त्यांनी संमतिदर्शक मान हालवतं म्हटले व स्वयंपाक पाण्याचा लवाजमा बघायला स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला तोवर सासूबाई बाहेर पडल्या होत्या.
दाराबाहेर रिक्शाचा आवाज आलेला पाहून सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर आल्या व बघतात तर मालती वहिनी रिक्षावाल्याला पैसे देत बाहेर पाठमोऱ्या उभ्या होत्या. त्यांना पाहताच पटकन त्या बैठकीच्या खोलीतली आवराआवर करू लागल्या इतक्यात वैशुने त्यांच्याकडे जाऊन लाडेलाडे त्यांना 'माज्या आईला मतं द्या' चा नारा पुकारलेला त्यांनी ऐकला. हंसत हंसत त्या मालतीवहिनींच्या स्वागतासाठी दारापर्यंत गेल्या."काय सुंदर आणी दणदणीत भाषण केलेस तू सुरेखा काल, साफ दाणादाण उडवून लावली पाटलांची" मालती वहिनी कौतुकाने म्हणू लागल्या."आपले व संतोषभाऊंचे आशीर्वाद सार्थकी लागले म्हणायचे की," त्यांनी विनयाने म्हटले."माझे कसले आशीर्वाद घेऊन बसलीस, तू जात्याच हुशार; म्हणून छान बोललीस हो" वहिनींचा कौतुकाचा भर काही ओसरायला तयार नव्हता."बसा हं, मी पाणी आणते" त्या स्वयंपाकघराकडे जायला वळल्या. पाणी दिल्यावर "आज इकडे कसा दौरा वहिनी ?" सुरेखाताईंनी विचारले."खास तुला भेटायला आले; तुझी माफी मागायची होती" मालतीवहिनींच्या डोळ्यांत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.एक क्षण गोंधळून जाऊन सुरेखाताई त्यांच्याकडे बघतच राहिल्या."माझ्या कार्ट्याने जो अतिप्रसंग केला त्याबद्दल मी क्षमा मागते सुरेखा तुझी" मालती वहिनी दोन्ही हात जोडीत म्हणाल्या.काय बोलावे हे काही क्षण सुरेखाताईंना कळेचना...."प्रियांक कडून अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे काय करावे हे मलाही कळेना वहिनी, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर थोबाडीतच ठेवून दिली असती मी." त्या पटकन बोलल्या."तीच चूक केलीस सुरेखा तू, सर्वांसमक्ष दोन चढवून दिल्या असत्या तर बरं झालं असत" वहिनी म्हणाल्या."पण त्यामुळे प्रश्न सुटला नसता वहिनी; चिघळला असता. काही वेळा तरुण रक्ताला डिवचल्याने ते अजूनच उफाळून वर येते. प्रियाने एकटीने समजावले असते तरी बराच परिणाम झाला असता.""पण मला कळले हेही बरे झाले बाई, आपली मुले आपल्या अपरोक्ष बाहेर काय धंदे करतात हे घरात बसून कळणे कठीणच आहे" मालती वहिनी म्हणाल्या."वहिनी, तुमच्या जागी मी असते तरी माझीही अशीच अवस्था झाली असती. मलाही इतकेच वाईट वाटले असते....." सुरेखाताई त्यांना समजावण्याच्या सुरांत बोलल्या.मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मालती वहिनी वारंवार माफी मागत घरी जायला निघाल्या.त्या गेल्यावर बराच वेळ सुरेखा ताई पायरीवर एकट्याच शून्यांत नजर लावून बसून होत्या.... एका मातेला तिने न केलेल्या गुन्ह्या बद्दल माफी मागायला लागल्याचे त्यांनाही दु:ख झाले होते. आजकालच्या सामाजिक अध:पतनाचे वैषम्य त्यांना चांगलेच जाणवून गेले.*************************************सुरेखा ताईंनी दुपारी वाड्यातल्या बायकांना जमवून गल्लीबोळांतून हळदी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या निमित्ताने मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत आपला मतदारांशी संपर्क राहील अशी अटकळ त्यांनी बांधली होती. सायंकाळी उशीराने राजाभाऊ घरी परते पर्यंत बराचसा भाग त्यांनी पादाक्रांत केलेला होता.आजचा दिवस तर त्यांचा होता पण रात्र वैऱ्याची होती. रात्री धोका जास्त होता...... व तो झालाच !पैशांनी मत फोडण्यास सुरुवात झाली. घरोघर दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटली गेली. जळगांवहून आलेले राजेंद्र गाजरेंचे कार्यकर्ते रात्रभर मोठमोठ्या थैल्या घेऊन फिरत होते. संतोषभाऊंनी पोलिस स्टेशनला फोन लावला पण बोरसे साहेबांना तातडीच्या कामानिमित्त जळगांवला जावे लागल्याचे त्यांना फोनवर सांगण्यात आले. डिसीपी हेगडेंचा डाव उजवा पडल्याचे भाऊंच्या लक्षात आले. आता मतदार राजाच तो काय वाली असे समजून पक्षाचे सगळेच कार्यकर्ते गप्प बसले. सुरेखा ताईंचा राग मात्र आतल्या आत धुमसत होता.**************************************मतदानाचा दिवस उगवला.... केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या. आजचे मतदान थोडे जास्तच होणार असल्याच्या अटकळी पत्रकार लोक सकाळपासून करू लागले. खेड्यापाड्यांवरून समाधानकारक मतदान होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही ठिकाणी नानासाहेब पाटलांची मंडळी गटागटाने माणसांना बायांना मतदानासाठी घराबाहेर काढीत असल्याच्या बातम्या आल्या. काल परवा पर्यंत आपल्या सोबत असणारी असलेली आसपासची मंडळी आपली नजर चुकवत असल्याचा भास सुरेखाताईंना होऊ लागला. त्या मनातून घाबरल्या..... राजाभाऊंनाही बदलत्या परिस्थितीची जाणीव झाली, एक राजकीय निरीक्षक म्हणून ह्या सगळ्यांचा अर्थ त्यांना कळत होता. दिवसभर कुंद व विचित्र वातावरण पसरलेले होते.... मतदान शांततेत पार पडल्याच्या बातम्या सायंकाळी सह्याद्री वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात आल्या. अट्रावलला होत असलेल्या मतदानावर डिसीपी हेगडे जातीने लक्ष ठेवून असल्याचा खास उल्लेख केला गेला तेव्हा सुरेखाताई उपहासाने व तुच्छतेने हसल्या.***********************************
तेजस्विनी-१२
मतमोजणी दोन दिवसांनंतर होती. तो दिवस उजाडला.आसपासच्या केंद्रांची मत मोजणी भुसावळच्या तहसीलदार कचेरीत होणार होती. सकाळपासून काही उत्साही कार्यकर्त्यांचा गट भुसावळला जाऊन ठेपला. राजाभाऊ इतर मंडळींबरोबर दुपारच्या सुमारास तेथे पोहचणार होते."काहीही झाले तरी घरा बाहेर पडू नकोस... वैशु व आईला सोडून अंगणाच्या बाहेरही पाय टाकू नकोस" अशी सक्त ताकीद राजाभाऊंनी सुरेखाताईंना दिलेली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर अतिउत्साही कार्यकर्ते हरलेल्या उमेदवारांना कसल्या प्रकारची वागणूक देतात ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती.सुरेखाताई अस्वस्थ पणे घरातल्या घरांत फेऱ्या मारू लागल्या. दूरदर्शनाच्या मराठी वाहिनीवर मतदानासंदर्भात कुठल्याही बातम्या प्रदर्शित केल्या जात नव्हत्या. जळगांवच्या आकाशवाणीवरूनही फक्त मोघम बातम्याच दिल्या जात होत्या. मध्येच एखाद्या कार्यकर्त्यांचा गट आरडा ओरडा करीत पाटील वाड्याच्या दिशेने जाताना दिसे पण नेमके काय घडते ते कळायला मार्ग नसल्याने सुरेखाताई अजूनच अस्वस्थ होत होत्या. दुपारी अचानक बातमी थडकली.... शेजारच्या चव्हाणांच्या मुलाने मोहिनी इंगळे अडीच हजार मतांनी पुढे असल्याची बातमी चाचरत सुरेखाताईंना सांगितली.सुरेखाताईंना पायाखालची जमीन थरथरत असल्याचा भास झाला."अशक्य... केवळ अशक्य, जी बाई कधी व्यासपीठावर भाषणासाठी उभी राहिली नाही ती पुढे जाणेच अशक्य आहे." त्या म्हणाल्या."काकू, त्या पाटलांना काहीच अशक्य नाही हो...... त्यांनी उमेदवार म्हणून माणूसच नव्हे तर बैल उभा केला तरी लोक मतं त्यालाच देतील." चव्हाणांचा मुलगा त्यांची समजूत काढण्याच्या सुरांत म्हणाला.इतक्यात पाटील वाड्यासमोर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली व सुरेखाताईंच्या छातीत धस्स झाले."सुनील पाटलांचा अठराशे मतांनी विजय झाला. विचारे साहेब हरले" कोणीतरी बातमी आणली.सुरेखाताई मटकन खाली बसल्या. त्यानंतर काय होतंय, त्यात त्यांना रस राहिलेलाच नव्हता. घराचा दरवाजा बंद करून त्या माजघरात जाऊन पलंगावर पडल्या. 'मरो.... समाजालाच माझी गरज वाटत नाही तर मी का मारावं ह्या मेंढरांसाठी' नकळत एक निरीच्छा त्यांच्यात निर्माण झाली.
इतक्यात एकाएकी रस्त्यातला गोंधळ त्यांना ऐकू आला.... सुनील पाटलाच्या विजयाने चेकाळलेला एक गट बाहेर रस्त्यावर हुल्लडबाजी करीत होता....."घाला त्या रां*च्या घरावर दगड" कुठूनतरी आवाज आला."चौधरीची र*ल, बाहेर नीघ... हरलीस तर तोंड लपवतेस का ?" कोणीतरी गर्दीतला बोलला.ही वाक्ये ऐकून सुरेखाताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. विजेच्या चपळाईने दार उघडून त्या बाहेर आल्या."कोणाला रखेल म्हणतोस रे बेशरमा.... तुझ्या मायन तुला ह्यासाठीच जन्माला घातला का ?" दोन चार टाळक्यांकडे रोखून बघत त्यांनी सरळ प्रश्न केला.त्या रणमर्दानीचा आवेश पाहून पुढे उभे असलेले पाठ फिरवून पळ काढू लागले.... मागचे हळूहळू मागे सरकायला लागले..."कोणाची माय व्याली दगड घालायला त्येच पाह्त्ये मी पण" शेलक्या भाषेत व ओचे पदर खोचून त्या पुढे सरकल्या..... इतक्यात शेजारचे चव्हाण स्वत: बाहेर आले. "जाऊ द्या वैनीताय ह्या माणसांची डोस्की फिरलीत.... जा रे बाबा घरच्याला, तुमची काय दुश्मनी हाय ताईंशी ?" त्यांच्या ह्या वाक्याने थोडी पांगापांग झाली. इतक्यात शाळेत येणारे दोन चार नेहमीचे चेहरे गर्दीत सुरेखाताईंना दिसले."काय सोनावणे ? शाळेत भेटायला लाज वाटत होती का ?" त्यांनी सरळ प्रश्न केला तसा सोनवणे नांवाचा तो गृहस्थ "नाय मास्तरीण बाई म्या तर ह्यान्सी समजवायले आल्तू " असं बोलत मागच्या मागे कटला.
इतक्यात दोघे भाजमो चे कार्यकर्ते मोटर सायकलवर तेथे आले."जनजागृती पक्षाचा विजय असो.... सुरेखाताईंचा विजय असो..... ताई, सातशे मतांनी विजयी झाल्या..." अशी आरोळी ठोकत ते बोलले.... ते बोलत असतानाच एका पाठोपाठ एक पाच सात मोटरसायकलींवरून भाजमो व जनजागृती पक्षाचे कार्यकर्ते तेथे पोहचले.काय चाललंय ते सुरेखा ताईंना कळेचना.... हसावे की रडावे हे कळण्याच्याही मन:स्थितीबाहेर त्या होत्या.जनजागृती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेली फटाक्यांची माळ ताईंच्या घरासमोर लावली गेली. लांबलचक फटाक्यांची माळ संपेपर्यंत मघाशी आलेला हुल्लडबाज्यांचा तो गट मागच्या मागे सटकला. फटाक्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या घरादारांतून शेजारी मंडळी हळूहळू बाहेर पडू लागली. तोवर जनजागृती पक्षाचे भुसावळहून परतलेले बरेचसे कार्यकर्ते तेथे जमा झालेले होते. अभिनंदनाचा वर्षाव सुरेखाताईंवर सुरू झाला.एका शेजारणीने पंचारतीचे ताट करून आणले. अंगणाच्या बाहेरच गल्लीत सुरेखाताईंना ओवाळण्याची स्पर्धा महिलांमध्ये लागली.थोड्याच वेळांपूर्वी धटिंगणांच्या दडपशाही समोर नतमस्तक झालेले आपले शेजारी ते हेच का हा प्रश्न सुरेखाताईंना पडला.कोणीतरी आणलेला पेढ्यांचा बॉक्स उपस्थितांमध्ये वाटला जात होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून वैशुचे कोडकौतुक सुरू होते, सासूबाईंच्या डोळ्यांतली एक कौतुकाची झाक सुरेखा ताईंना सुखावून गेली.एका कार्यकर्त्याने त्याचा मोबाईल ताईंच्या हाती दिला. संतोषभाऊ फोनवर अभिनंदन करीत होते. तातडीने दूध महासंघाच्या कार्यालयात पोहचण्याचा आदेश घेत त्यांनी फोन बंद केला तेव्हा आपण राजाभाऊंबद्दल विचारले नाही ह्याची रुखरूख त्यांना लागून गेली. दूध महासंघाच्या कार्यालयातून विजयी उमेदवारांची मिरवणूक निघत असल्याचे त्यांना एकाने सांगितले.******************************************कपडे बदलून व ठेवणीतली साडी नेसून त्या कार्यकर्त्यांसोबत वैशुला घेऊन दूध महासंघाच्या कार्यालयात जायला निघाल्या. तेथे पोहचल्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांचा घोळका खाली जमा झाला असल्याचे त्यांनी पाहिले. घोळक्यांतून वाट काढत व अभिनंदनाचा वर्षाव स्वीकारत त्या वैशुला कडेवर घेऊन पुढे सरकत होत्या. त्यांच्या मागे त्यांच्या व पक्षाच्या नांवाचा जयजयकार होत होता.सभागृहात विजयी उमेदवारांसह बरेच कार्यकर्ते जमा झालेले दिसत होते. एकच गलबलाट तेथे उडाला होता. देसाई साहेब सगळ्यांना शांत करण्याचा अपयशी प्रयत्न करत होते. बराच वेळ तर काय घडले आहे ते कळायलाच मार्ग नव्हता. थोडी शांतता निर्माण होताच देसाई साहेबांनी जमावाचा ताबा घेतला. माइक वरून सभागृहात व बाहेर उभ्या असलेल्या करकरत्यांशी संपर्क साधून त्यांना निकाल ऐकण्यासाठी शांत राहण्याचे आवाहन केले गेले.तोवर परत एक गलका बाहेर ऐकू आला...... संतोषभाऊ उर्वरित गटासह भुसावळहून परत आलेले होते. ते वर पोहचे पर्यंत त्यांच्या, विजयी उमेदवारांच्या व पक्षाच्या नावाचा अखंड जयघोष सुरू होता.थोड्याच वेळांत शांतता प्रस्थापित करण्यात देसाई साहेबांना यश आले तेव्हा कुठे खरा निकाल हाती लागला.सुनील पाटलाने विचारे साहेबांचा फक्त सत्तर मतांनी पराभव केलेला होता.हा पराजय अगदी काठावर असल्याने सगळ्यांनाच त्याची प्रचंड रुखरुख लागून गेली.वासूभाऊंनी फेगडेंवर दणदणीत साडेसात हजारांनी विजय मिळवला होता.मोहिनी इंगळेचा पराभव सुरेखाताईंनी सहाशे सत्त्याण्णव मतांनी केलेला होता. ह्यांत खरा पराजय सुनील पाटलाचा होता.
अट्रावलातून अपेक्षेप्रमाणे इंदुताई भराडे विजयी झाल्या होत्या. निंभोऱ्याच्या निर्मला वहिनी व इंदुताई दोन हजारांवर मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. माळी वहिनींना निवडणूक जड गेली होती. त्यांचा मोठा पराभव अगदी अनपेक्षित होता. सावद्याला पैसे चरून मते फोडण्याचे प्रकार झालेले होते. संतोषभाऊंनी त्याबद्दल आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती व म्हणूनच त्यांना यायला उशीर झालेला होता.सर्वात कमालीचा निकाल लागला तो रावेर मतदार संघातून... भाजमो च्या नवख्या अजय फालकने सुहास पाटलाच्या साडूला चारी मुंड्या चीत केले होते. तरुणांनी राजकारणात अनुभवी माणसाला हरवण्याचा हा लोकशाहीतला पहिला प्रसंग नव्हता.वरणगांव मतदारसंघातून सुनील पाटलाचा उमेदवार जेमतेम काठावर पास झाला होता, तो अवघ्या सव्वाशे मतांनी.चिनावलहून भाजमो चेच राठी नांवाचे सद्गृहस्थ विजयी झाले होते.तर जामनेर मतदारसंघातून दोन्ही पक्षांचा पराजय करीत अपक्ष उमेदवार महेश भिरूड विजयी झालेला होता. त्याचे त्या विभागातले कार्य संतोषभाऊंसारखेच असल्याचे म्हटले जात होते. फैजपूरहून अजून एका अपक्षाने बाजी मारली होती. तेथेही भाजमो व आघाडीच्या दोघा उमेदवारांचा पराभव झालेला होता.
यावल सर्कल मधून निवडणुका भाजमो व जनजागृतीने जिंकलेल्या होत्या. झेड.पी च्या ११ व ग्रामपंचायतीच्या १३ अश्या एकंदर २४ जागांवरून युतीचे ६ व ७ असे तेरा सदस्य निवडून आलेले होते. सभागृह आता युतीच्या ताब्यात राहणार होते. दोघा अपक्षांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतून दिलेला पाठिंबा सार्थ ठरला होता. जामनेर व फैजपूरच्या झेड.पी. च्या जागांवरून पूर्ण पाठिंबा मिळाला असता. फक्त ७ जणांचा विरोध सभागृहात होणार होता. सर्कल मधून विकास आघाडी पक्षाची जोरदार पीछेहाट झालेली होती.ह्या बारीक सारीक घटनांना राज्य पातळीवर फार महत्त्व दिले जाई कारण ज्याच्या हाती ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतींचे राज्य..... त्या पक्षाच्या हाती राज्याची सत्ता असणार होती.ह्या निवडणुकांमधील विजयामुळे संतोषभाऊंची विधानसभेतली जागा जवळपास नक्की झालेली होती......
"मला तर बाई हा तेरा आकडा अशुभ वाटतो" भराडे बाई सुरेखाताईंना म्हणाल्या."काळजी करू नका..... सावद्याला फेरमतदान झाले तर तिथली जागा आपण जिंकूच" ह्या सुरेखाताईंच्या वाक्यावर त्या अचंबित होऊन त्यांच्या तोंडाकडेच पाहत राहिल्या.
यावलची सुनील पाटलाची, वरणगांवातली व सावद्यातली पैसे चरून जिंकलेली एक अश्या एकूण फक्त तीन जागांवर नानासाहेबांचे उमेदवार आलेले होते.बाकी सर्व ठिकाणी युतीने गड जिंकला होता.येत्या विधानसभा निवडणुकांत पारडे कुणीकडे झुकणार त्याचीच ही नांदी होती.ह्यावेळचा झेडपी अध्यक्ष कोण असेल त्यासाठी भल्याभल्यांना संतोषभाऊंच्या दारच्या पायऱ्या घासाव्या लागणार होत्या.
विजयी उमेदवारांची वाजत गाजत मिरवणूक निघाली तेव्हा पाटील वाड्यावर सुतकी अवकळा पसरलेली होती.************************************************
इतक्यात एकाएकी रस्त्यातला गोंधळ त्यांना ऐकू आला.... सुनील पाटलाच्या विजयाने चेकाळलेला एक गट बाहेर रस्त्यावर हुल्लडबाजी करीत होता....."घाला त्या रां*च्या घरावर दगड" कुठूनतरी आवाज आला."चौधरीची र*ल, बाहेर नीघ... हरलीस तर तोंड लपवतेस का ?" कोणीतरी गर्दीतला बोलला.ही वाक्ये ऐकून सुरेखाताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. विजेच्या चपळाईने दार उघडून त्या बाहेर आल्या."कोणाला रखेल म्हणतोस रे बेशरमा.... तुझ्या मायन तुला ह्यासाठीच जन्माला घातला का ?" दोन चार टाळक्यांकडे रोखून बघत त्यांनी सरळ प्रश्न केला.त्या रणमर्दानीचा आवेश पाहून पुढे उभे असलेले पाठ फिरवून पळ काढू लागले.... मागचे हळूहळू मागे सरकायला लागले..."कोणाची माय व्याली दगड घालायला त्येच पाह्त्ये मी पण" शेलक्या भाषेत व ओचे पदर खोचून त्या पुढे सरकल्या..... इतक्यात शेजारचे चव्हाण स्वत: बाहेर आले. "जाऊ द्या वैनीताय ह्या माणसांची डोस्की फिरलीत.... जा रे बाबा घरच्याला, तुमची काय दुश्मनी हाय ताईंशी ?" त्यांच्या ह्या वाक्याने थोडी पांगापांग झाली. इतक्यात शाळेत येणारे दोन चार नेहमीचे चेहरे गर्दीत सुरेखाताईंना दिसले."काय सोनावणे ? शाळेत भेटायला लाज वाटत होती का ?" त्यांनी सरळ प्रश्न केला तसा सोनवणे नांवाचा तो गृहस्थ "नाय मास्तरीण बाई म्या तर ह्यान्सी समजवायले आल्तू " असं बोलत मागच्या मागे कटला.
इतक्यात दोघे भाजमो चे कार्यकर्ते मोटर सायकलवर तेथे आले."जनजागृती पक्षाचा विजय असो.... सुरेखाताईंचा विजय असो..... ताई, सातशे मतांनी विजयी झाल्या..." अशी आरोळी ठोकत ते बोलले.... ते बोलत असतानाच एका पाठोपाठ एक पाच सात मोटरसायकलींवरून भाजमो व जनजागृती पक्षाचे कार्यकर्ते तेथे पोहचले.काय चाललंय ते सुरेखा ताईंना कळेचना.... हसावे की रडावे हे कळण्याच्याही मन:स्थितीबाहेर त्या होत्या.जनजागृती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेली फटाक्यांची माळ ताईंच्या घरासमोर लावली गेली. लांबलचक फटाक्यांची माळ संपेपर्यंत मघाशी आलेला हुल्लडबाज्यांचा तो गट मागच्या मागे सटकला. फटाक्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या घरादारांतून शेजारी मंडळी हळूहळू बाहेर पडू लागली. तोवर जनजागृती पक्षाचे भुसावळहून परतलेले बरेचसे कार्यकर्ते तेथे जमा झालेले होते. अभिनंदनाचा वर्षाव सुरेखाताईंवर सुरू झाला.एका शेजारणीने पंचारतीचे ताट करून आणले. अंगणाच्या बाहेरच गल्लीत सुरेखाताईंना ओवाळण्याची स्पर्धा महिलांमध्ये लागली.थोड्याच वेळांपूर्वी धटिंगणांच्या दडपशाही समोर नतमस्तक झालेले आपले शेजारी ते हेच का हा प्रश्न सुरेखाताईंना पडला.कोणीतरी आणलेला पेढ्यांचा बॉक्स उपस्थितांमध्ये वाटला जात होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून वैशुचे कोडकौतुक सुरू होते, सासूबाईंच्या डोळ्यांतली एक कौतुकाची झाक सुरेखा ताईंना सुखावून गेली.एका कार्यकर्त्याने त्याचा मोबाईल ताईंच्या हाती दिला. संतोषभाऊ फोनवर अभिनंदन करीत होते. तातडीने दूध महासंघाच्या कार्यालयात पोहचण्याचा आदेश घेत त्यांनी फोन बंद केला तेव्हा आपण राजाभाऊंबद्दल विचारले नाही ह्याची रुखरूख त्यांना लागून गेली. दूध महासंघाच्या कार्यालयातून विजयी उमेदवारांची मिरवणूक निघत असल्याचे त्यांना एकाने सांगितले.******************************************कपडे बदलून व ठेवणीतली साडी नेसून त्या कार्यकर्त्यांसोबत वैशुला घेऊन दूध महासंघाच्या कार्यालयात जायला निघाल्या. तेथे पोहचल्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांचा घोळका खाली जमा झाला असल्याचे त्यांनी पाहिले. घोळक्यांतून वाट काढत व अभिनंदनाचा वर्षाव स्वीकारत त्या वैशुला कडेवर घेऊन पुढे सरकत होत्या. त्यांच्या मागे त्यांच्या व पक्षाच्या नांवाचा जयजयकार होत होता.सभागृहात विजयी उमेदवारांसह बरेच कार्यकर्ते जमा झालेले दिसत होते. एकच गलबलाट तेथे उडाला होता. देसाई साहेब सगळ्यांना शांत करण्याचा अपयशी प्रयत्न करत होते. बराच वेळ तर काय घडले आहे ते कळायलाच मार्ग नव्हता. थोडी शांतता निर्माण होताच देसाई साहेबांनी जमावाचा ताबा घेतला. माइक वरून सभागृहात व बाहेर उभ्या असलेल्या करकरत्यांशी संपर्क साधून त्यांना निकाल ऐकण्यासाठी शांत राहण्याचे आवाहन केले गेले.तोवर परत एक गलका बाहेर ऐकू आला...... संतोषभाऊ उर्वरित गटासह भुसावळहून परत आलेले होते. ते वर पोहचे पर्यंत त्यांच्या, विजयी उमेदवारांच्या व पक्षाच्या नावाचा अखंड जयघोष सुरू होता.थोड्याच वेळांत शांतता प्रस्थापित करण्यात देसाई साहेबांना यश आले तेव्हा कुठे खरा निकाल हाती लागला.सुनील पाटलाने विचारे साहेबांचा फक्त सत्तर मतांनी पराभव केलेला होता.हा पराजय अगदी काठावर असल्याने सगळ्यांनाच त्याची प्रचंड रुखरुख लागून गेली.वासूभाऊंनी फेगडेंवर दणदणीत साडेसात हजारांनी विजय मिळवला होता.मोहिनी इंगळेचा पराभव सुरेखाताईंनी सहाशे सत्त्याण्णव मतांनी केलेला होता. ह्यांत खरा पराजय सुनील पाटलाचा होता.
अट्रावलातून अपेक्षेप्रमाणे इंदुताई भराडे विजयी झाल्या होत्या. निंभोऱ्याच्या निर्मला वहिनी व इंदुताई दोन हजारांवर मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. माळी वहिनींना निवडणूक जड गेली होती. त्यांचा मोठा पराभव अगदी अनपेक्षित होता. सावद्याला पैसे चरून मते फोडण्याचे प्रकार झालेले होते. संतोषभाऊंनी त्याबद्दल आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती व म्हणूनच त्यांना यायला उशीर झालेला होता.सर्वात कमालीचा निकाल लागला तो रावेर मतदार संघातून... भाजमो च्या नवख्या अजय फालकने सुहास पाटलाच्या साडूला चारी मुंड्या चीत केले होते. तरुणांनी राजकारणात अनुभवी माणसाला हरवण्याचा हा लोकशाहीतला पहिला प्रसंग नव्हता.वरणगांव मतदारसंघातून सुनील पाटलाचा उमेदवार जेमतेम काठावर पास झाला होता, तो अवघ्या सव्वाशे मतांनी.चिनावलहून भाजमो चेच राठी नांवाचे सद्गृहस्थ विजयी झाले होते.तर जामनेर मतदारसंघातून दोन्ही पक्षांचा पराजय करीत अपक्ष उमेदवार महेश भिरूड विजयी झालेला होता. त्याचे त्या विभागातले कार्य संतोषभाऊंसारखेच असल्याचे म्हटले जात होते. फैजपूरहून अजून एका अपक्षाने बाजी मारली होती. तेथेही भाजमो व आघाडीच्या दोघा उमेदवारांचा पराभव झालेला होता.
यावल सर्कल मधून निवडणुका भाजमो व जनजागृतीने जिंकलेल्या होत्या. झेड.पी च्या ११ व ग्रामपंचायतीच्या १३ अश्या एकंदर २४ जागांवरून युतीचे ६ व ७ असे तेरा सदस्य निवडून आलेले होते. सभागृह आता युतीच्या ताब्यात राहणार होते. दोघा अपक्षांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतून दिलेला पाठिंबा सार्थ ठरला होता. जामनेर व फैजपूरच्या झेड.पी. च्या जागांवरून पूर्ण पाठिंबा मिळाला असता. फक्त ७ जणांचा विरोध सभागृहात होणार होता. सर्कल मधून विकास आघाडी पक्षाची जोरदार पीछेहाट झालेली होती.ह्या बारीक सारीक घटनांना राज्य पातळीवर फार महत्त्व दिले जाई कारण ज्याच्या हाती ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतींचे राज्य..... त्या पक्षाच्या हाती राज्याची सत्ता असणार होती.ह्या निवडणुकांमधील विजयामुळे संतोषभाऊंची विधानसभेतली जागा जवळपास नक्की झालेली होती......
"मला तर बाई हा तेरा आकडा अशुभ वाटतो" भराडे बाई सुरेखाताईंना म्हणाल्या."काळजी करू नका..... सावद्याला फेरमतदान झाले तर तिथली जागा आपण जिंकूच" ह्या सुरेखाताईंच्या वाक्यावर त्या अचंबित होऊन त्यांच्या तोंडाकडेच पाहत राहिल्या.
यावलची सुनील पाटलाची, वरणगांवातली व सावद्यातली पैसे चरून जिंकलेली एक अश्या एकूण फक्त तीन जागांवर नानासाहेबांचे उमेदवार आलेले होते.बाकी सर्व ठिकाणी युतीने गड जिंकला होता.येत्या विधानसभा निवडणुकांत पारडे कुणीकडे झुकणार त्याचीच ही नांदी होती.ह्यावेळचा झेडपी अध्यक्ष कोण असेल त्यासाठी भल्याभल्यांना संतोषभाऊंच्या दारच्या पायऱ्या घासाव्या लागणार होत्या.
विजयी उमेदवारांची वाजत गाजत मिरवणूक निघाली तेव्हा पाटील वाड्यावर सुतकी अवकळा पसरलेली होती.************************************************
तेजस्विनी-शेवट
सुरेखा ताईंचा पुढचा पूर्ण आठवडा विविध सत्कार समारंभाला हजेरी लावण्यात गेला.लोक प्रतिनिधींना सरकारी नोकरी करता येत नसल्याने सुरेखा ताईंना नगरपालिका चालवत असलेली ती शाळा सोडावी लागणार होती. शाळेतल्या नोकरीचा राजीनामा देताना त्यांचे डोळे भरून आले होते..... शाळेने त्यांना निरोप द्यायचे ठरवले. सोबत झेड.पी. सदस्य झाल्याबद्दल सत्कारही करण्याचे योजिले होते. शाळेतला सत्कार समारंभ मोहिनी इंगळेच्या हस्ते झालेला होता. मोहिनीला निवडणुकीत हरल्याचे सोयर सुतकही नव्हते.वैद्य बुवांनी घरी बोलवून सौ. च्या हस्ते सुरेखाताईंची खणानारळाने ओटी भरली व तोंड भरून 'गरीबांच्या कामाला ये' असा आशीर्वाद देत त्यांचा सत्कार करून निरोप दिला.येत्या सोमवारपासून सभागृह भरणार होते. अजून चार दिवस बाकी होते, सुरेखाताईंची उत्सुकता शिगेला पोहचली होती.**********************************जिल्ह्यात एक एका सभासदाची जुळवा जुळव सुरू झाली. झेडपीच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवार कोण ह्यावर जोरदार चर्चा सुरू होती.जिल्ह्यातल्या ४ सर्कल मधून झेड.पी.च्या ४८ जागा होत्या. भुसावळ, यावल, चोपडा व जामनेर सर्कलमधून भा.ज.मो. व जनजागृती पक्षाची सरशी झालेली होती. बावीस जागांपैकी चौदा जागांवर युतीला यश आलेले होते. आयोगाने मान्य केल्यास सावद्यात फेरमतदान झाले असते ते वेगळेच.... तर जळगाव, एदलाबाद सर्कल मधून विकास आघाडीने बाजी मारली होती. सव्वीस जागांपैकी अठरा जागा त्यांनी कमावल्या होत्या. काही बंडखोर व काही अपक्ष उमेदवार तळ्यात मळ्यांत करीत होते. पण एकूण परिस्थिती पाहता विकास आघाडी पक्षाचाच उमेदवार अध्यक्ष पदी येण्याचे जवळपास नक्की होते. आघाडीतल्या असंतुष्टांनी विरोधात मतदान केल्यासच राजेंद्र गाजरेंचा पराभव झाला असता. तशी शक्यता मात्र धूसर होती.
संतोषभाऊंना फोडाफोडीचे राजकारण खेळायचे नव्हते. 'जसे पेरावे तसे उगवते' ह्या मताचे ते होते. जे यश पक्षाने कमावले ते अपेक्षेपेक्षा जास्त होते.... अचानक मिळालेल्या सत्तेपेक्षा विरोधी बाकांवर बसून विरोध करणे त्यांनी पसंत केले असते. ह्याच विचारसरणीचे भाजमो चे पक्षश्रेष्ठी होते. एकूण मिळालेल्या वीस जागांपैकी भाजमो च्या पाच तर जनजागृतीच्या पंधरा जागा होत्या.... उपाध्यक्ष पदासाठी वासूभाऊंसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला बसवून इतर समित्यांच्या निवडींवर लक्ष देण्याचे बैठकीत ठरले.राजाभाऊ व देसाई साहेबांचा पंचायतींच्या कामकाजाचा अभ्यास कामी आला. भाजमो ने राजाभाऊंची खास वाखाणणी केली. असा अभ्यासक मिळाल्याने पक्षाची ताकद दुप्पट झाल्याचे मत बैठकीत पक्ष धुरंधरांनी नोंदवले.संतोषभाऊंना आपल्या जवळ असलेल्या हिऱ्यांची व्यवस्थित पारख होती..... राजाभाऊंची निरीक्षणे त्यांच्या सवयीची होती.....
विकास आघाडीत मात्र अचानक झालेल्या पराभवाच्या वादळाचे सावट सर्वदुर पसरले. राजेंद्र बोरसें विरुद्ध कधी नव्हे तो आवाज उठू लागलेला होता. अनेक समित्यांची अध्यक्षपदे ह्या वेळी पक्षातल्या विरोधकांना द्यावी लागणार असल्याची चिन्हे दिसत होती. खुद्द राजेंद्रचे अध्यक्षपद टिकते की नाही ह्याबद्दलच शंका कुशंका उपस्थित होऊ लागलेल्या होत्या.ह्याच पार्श्वभूमीवर संतोषभाऊंनी सावद्याच्या जागेवरून उठवलेला गदारोळ आयोगाने मान्य करीत सावद्याच्या जागेवर फेरमतदानाची संतोषभाऊंची मागणी मान्य केली व आघाडीवर अजून एक घाव पडला. मात्र जोवर सावद्याच्या जागेवर फेरमतदान होत नाही तोवर सभागृह भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. संतोषभाऊंना व युतीला जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्या निर्णयाने फारसा फरक पडणार नव्हता पण आघाडीत मात्र चलबिचल सुरू झाली. झेडपी अध्यक्षपदावरून व विविध समित्यांच्या अध्यक्षपदांवरून पक्षांतर्गत घोडेबाजाराला उत येणार होता.
देसाई साहेब व राजाभाऊंसारखे खंदे राजकीय अभ्यासक परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. त्यांच्या मते आघाडीतल्या फक्त तीन मतांनी पारडे पालटणार होते. जामनेरचे महेश भिरूड गळ घातल्यास संतोषभाऊंसाठी वासुभाऊंना मत द्यायला तयार झाले असते. तोच प्रकार मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवाराचा होता. बावीस मते जमत होती फक्त तीन मते वासुभाउंच्या पारड्यात पडली तर वासुभाऊंनी ह्या उतार वयांत उपाध्यक्षाऐवजी अध्यक्ष पदाचे स्थान ग्रहण केले असते. पण त्यासाठी कुठलीही तडजोड करायला जनजागृतीचे व भाजमो चे पक्षधुरीणी अजिबात तयार नव्हते. स्वच्छ राजकारण करणे हेच संतोषभाऊंचे प्रमुख ध्येय होते.*************************************सावद्यात उमेदवारांना प्रचार करता येणार नव्हता परंतू मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यास हरकत नव्हती. जनजागृती पक्षाने ह्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला व भाजमोच्या कार्यकर्त्यांचा ताफा पथनाट्ये तर जनजागृतीच्या महिलांनी सामूहिक हळदीकुंकू वगैरे समारंभ आयोजीत करीत जोरदार मुसंडी मारली.आयोगाच्या अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष सर्व प्रकारांकडे असल्याने आघाडी ज्या विषयांत पारंगत होती त्यात तिला चक्क अपयश आले. दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटण्याआधीच लपवून ठेवण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली.माळी वहिनींचा विजय म्हणजे फक्त एक औपचारिकता राहून गेली.जिल्ह्यातले युतीचे बळ आणखी एका जागेने वाढले.आघाडीतली चलबिचल वेगळेच रूप घेऊ लागली.**************************************बाहेर पाखरांची किलबिल चालू झाली... गायींच्या गोठ्यातून हंबरड्याचा आवाज मोठा व्हायला लागला.गल्लीच्या कोपऱ्यावरच्या मंदिरातून काकड आरतीचे स्वर घुमू लागले...... हळूहळू यावल गांवाला जाग येत होती.सूर्य उगवायला अजून बराच वेळ होता तरीही लोकांची प्रात:कालीन कामे सुरू झालेली होती. रोजच्या सारखाच हाही दिवस उजाडत होता.पण सुरेखाताईंसाठी मात्र ह्या दिवसाचे विशेष महत्त्व होते.आज त्यांना ह्या घराशी जन्मभराचे नाते जोडून आठ वर्षे पूर्ण झाली होती......आणी आजच सभागृहात झेड.पी. सभासद म्हणून त्या शपथही ग्रहण करणार होत्या.....गाढ झोपलेल्या राजाभाऊंवर एकवार नजर फिरवत त्या बिछान्यातून उठल्या, देवघरात जाऊन देवाला नमन करीत त्यांनी मागल्या पडवीचे दार उघडले. त्यांना बघताच कृष्णा अजूनच जोरजोरात हंबरायला लागली. तिच्या पुढे चाऱ्याची चळत व पाण्याची बादली ठेवून त्यांनी तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवला.....देवा पाठोपाठ कृष्णा गायीचे दर्शन घेतल्या खेरीज त्यांच्या दिवसाला सुरुवात होत नसे.सकाळची सर्व कामे आटोपून होईपर्यंत राजाभाऊ कॉलेजला जायला तयार झाले होते. "आज काय आणू ?" हळूच त्यांनी विचारले.गोंधळात पडल्यासारखा चेहरा करीत त्या म्हणाल्या, "कशाबद्दल ? शपथ ग्रहण करणार म्हणून का ?"अवखळपणे हसत राजाभाऊ म्हणाले,"नव्हे... आम्हाला आजन्म कैदी बनवल्याबद्दल"सुरेखा ताईंच्या स्मितहास्या सोबत त्यांनी घर सोडले....
सुरेखा ताईंना दुपारची शाळा असे. बाराच्या ठोक्याला त्या घर सोडत त्यापूर्वी बालवाडीतल्या वैशुला त्या घेऊन येत. वैशुला आजी भरवत असताना त्यांना निघावे लागे. आज पासूनचा दिनक्रम वेगळा असणार होता. सकाळी दहाला वैशुला बालवाडीत सोडून त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयांत जाणार होत्या. सभागृहाच्या कामकाजाला सकाळी साडे दहाला सुरुवात होणार होती. दुपारी एकला सभागृह संपताच त्या घरी जाणार होत्या. काही दिवस हाच दिनक्रम ठेवून मग एखादी अंगणवाडी शिक्षिकेची नोकरी करायचा विचार त्यांनी केला होता. आपल्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हायलाच हवा ह्या राजाभाऊंच्या मतांशी त्या सहमत होत्या.
जिल्हापंचायतीच्या कार्यालयात त्या सव्वा दहाच्या सुमारास पोहचल्या तेव्हा एकही सभासद हजर नव्हता. गेल्या गेल्याच त्यांची मोकाशी नांवाच्या कारकुनाशी ओळख झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव श्री. नारायण अत्तरदेंचा तो सचिव होता. बरीचशी महत्त्वाच्या फायली ज्यांच्यावर शेवटचे हात फिरवावे लागत, त्या मोकाशींकडेच येत. मोकाशींनी तोंड भरून सुरेखाताईंचे कौतुक केले..."राजाभाऊ जाधवांना मी ओळखतो ताई.... आपले भाषणही ऐकले आहेच, तुम्हाला आठवत नाही पण आंबेगावहून आपली बदली येथे झाली तेव्हा त्या फाइल वर मीच काम केले होते." मोकाशींनी आठवणी सांगितल्या."हो, मी लग्नापूर्वी आंबेगावलाच शिक्षिका म्हणून होते....पण मी बदलीच्या कामानिमित्त झेड.पी. त मात्र कधी आले नव्हते" त्यांनी आठ वर्षापूर्वीच्या त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करीत म्हटले.इतक्यात भराडे बाई व माळी वहिनी तेथे आल्या.सगळ्या जणी मग सभागृहाकडे कुच करू लागल्या. एका नव्या युगांत सुरेखाताईंचा प्रवेश होत होता......
एक एक करीत सभासद सभागृहात दाखल होत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध समित्या व उपसमित्यांचे सदस्य हे एकत्रच जिल्हा परिषदेच्या कामकाजाखाली मोडत. ग्रामपंचायत व झेड.पी.च्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा तर समित्यांच्या सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल असे सरकारने ठरवून दिले होते. झेड.पी.चे सदस्य जिल्हा पंचायतीच्या अख्यतारीत येत असलेल्या कामकाजांवर प्रतिनिधित्व करीत तर ग्राम पंचायतीच्या कामांवर त्यांचे सदस्य काम करीत.प्रत्येक समितीवर एक सभापती, एक उपसभापती, तीन झेडपी सदस्य, तिघे ग्रामपंचायतीचे सदस्य व तीन नगरपालिकेचे सदस्य काम बघत.समितीकडे कामकाज जास्त असल्यास उपसमीती नेमली जाई. नगरपालिकेचे सदस्य स्वत:च्या वेगळ्या निवडणुकांतून निवडून येत व त्यांचे अधिकार मर्यादित असले तरी त्यांच्या अनुमतीखेरीज कामे पुढे सरकत नव्हती. झेड.पी., ग्राम पंचायत व नगरपालिका ह्या तिघी स्वायत्त संस्था होत्या व गावागावातून राज्य व केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात त्यांना मदत करीत होत्या. राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या झेड.पी व ग्रामपंचायतींच्या सभासदांना पगार व भत्ते राज्य सरकार देई तर नगरपालिकेच्या सभासदांना नगरपरिषद देई.वरचा मलिदा मात्र त्यांना स्वत:ची अक्कल लढवूनच कमावावा लागे.......
सुरुवातीसच ओळख समारंभ पार पडला त्यानंतर लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्तरदेंनी वयोवृद्ध वासुभाऊंना शपथ ग्रहण करायला व्यासपीठावर बोलावले. इतरांनी जेष्ठते नुसार एका पाठोपाठ एक स्वत:च्या डायस समोरच उभे राहून शपथ घ्यायची होती.......
उंच छत असलेल्या भव्य सभागृहात एक आवाज अत्यंत आत्मविश्वासाने उमटला.......
"मी, सौभाग्यवती सुरेखा राजेश्वर जाधव, ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेते की.........
'तेजस्विनी'च्या एका नव्या पर्वाच्या प्रथम अध्यायाला सुरुवात झालेली होती.
~समाप्त~
संतोषभाऊंना फोडाफोडीचे राजकारण खेळायचे नव्हते. 'जसे पेरावे तसे उगवते' ह्या मताचे ते होते. जे यश पक्षाने कमावले ते अपेक्षेपेक्षा जास्त होते.... अचानक मिळालेल्या सत्तेपेक्षा विरोधी बाकांवर बसून विरोध करणे त्यांनी पसंत केले असते. ह्याच विचारसरणीचे भाजमो चे पक्षश्रेष्ठी होते. एकूण मिळालेल्या वीस जागांपैकी भाजमो च्या पाच तर जनजागृतीच्या पंधरा जागा होत्या.... उपाध्यक्ष पदासाठी वासूभाऊंसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला बसवून इतर समित्यांच्या निवडींवर लक्ष देण्याचे बैठकीत ठरले.राजाभाऊ व देसाई साहेबांचा पंचायतींच्या कामकाजाचा अभ्यास कामी आला. भाजमो ने राजाभाऊंची खास वाखाणणी केली. असा अभ्यासक मिळाल्याने पक्षाची ताकद दुप्पट झाल्याचे मत बैठकीत पक्ष धुरंधरांनी नोंदवले.संतोषभाऊंना आपल्या जवळ असलेल्या हिऱ्यांची व्यवस्थित पारख होती..... राजाभाऊंची निरीक्षणे त्यांच्या सवयीची होती.....
विकास आघाडीत मात्र अचानक झालेल्या पराभवाच्या वादळाचे सावट सर्वदुर पसरले. राजेंद्र बोरसें विरुद्ध कधी नव्हे तो आवाज उठू लागलेला होता. अनेक समित्यांची अध्यक्षपदे ह्या वेळी पक्षातल्या विरोधकांना द्यावी लागणार असल्याची चिन्हे दिसत होती. खुद्द राजेंद्रचे अध्यक्षपद टिकते की नाही ह्याबद्दलच शंका कुशंका उपस्थित होऊ लागलेल्या होत्या.ह्याच पार्श्वभूमीवर संतोषभाऊंनी सावद्याच्या जागेवरून उठवलेला गदारोळ आयोगाने मान्य करीत सावद्याच्या जागेवर फेरमतदानाची संतोषभाऊंची मागणी मान्य केली व आघाडीवर अजून एक घाव पडला. मात्र जोवर सावद्याच्या जागेवर फेरमतदान होत नाही तोवर सभागृह भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. संतोषभाऊंना व युतीला जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्या निर्णयाने फारसा फरक पडणार नव्हता पण आघाडीत मात्र चलबिचल सुरू झाली. झेडपी अध्यक्षपदावरून व विविध समित्यांच्या अध्यक्षपदांवरून पक्षांतर्गत घोडेबाजाराला उत येणार होता.
देसाई साहेब व राजाभाऊंसारखे खंदे राजकीय अभ्यासक परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. त्यांच्या मते आघाडीतल्या फक्त तीन मतांनी पारडे पालटणार होते. जामनेरचे महेश भिरूड गळ घातल्यास संतोषभाऊंसाठी वासुभाऊंना मत द्यायला तयार झाले असते. तोच प्रकार मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवाराचा होता. बावीस मते जमत होती फक्त तीन मते वासुभाउंच्या पारड्यात पडली तर वासुभाऊंनी ह्या उतार वयांत उपाध्यक्षाऐवजी अध्यक्ष पदाचे स्थान ग्रहण केले असते. पण त्यासाठी कुठलीही तडजोड करायला जनजागृतीचे व भाजमो चे पक्षधुरीणी अजिबात तयार नव्हते. स्वच्छ राजकारण करणे हेच संतोषभाऊंचे प्रमुख ध्येय होते.*************************************सावद्यात उमेदवारांना प्रचार करता येणार नव्हता परंतू मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यास हरकत नव्हती. जनजागृती पक्षाने ह्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला व भाजमोच्या कार्यकर्त्यांचा ताफा पथनाट्ये तर जनजागृतीच्या महिलांनी सामूहिक हळदीकुंकू वगैरे समारंभ आयोजीत करीत जोरदार मुसंडी मारली.आयोगाच्या अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष सर्व प्रकारांकडे असल्याने आघाडी ज्या विषयांत पारंगत होती त्यात तिला चक्क अपयश आले. दारूच्या बाटल्या व पैशांची पाकिटे वाटण्याआधीच लपवून ठेवण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली.माळी वहिनींचा विजय म्हणजे फक्त एक औपचारिकता राहून गेली.जिल्ह्यातले युतीचे बळ आणखी एका जागेने वाढले.आघाडीतली चलबिचल वेगळेच रूप घेऊ लागली.**************************************बाहेर पाखरांची किलबिल चालू झाली... गायींच्या गोठ्यातून हंबरड्याचा आवाज मोठा व्हायला लागला.गल्लीच्या कोपऱ्यावरच्या मंदिरातून काकड आरतीचे स्वर घुमू लागले...... हळूहळू यावल गांवाला जाग येत होती.सूर्य उगवायला अजून बराच वेळ होता तरीही लोकांची प्रात:कालीन कामे सुरू झालेली होती. रोजच्या सारखाच हाही दिवस उजाडत होता.पण सुरेखाताईंसाठी मात्र ह्या दिवसाचे विशेष महत्त्व होते.आज त्यांना ह्या घराशी जन्मभराचे नाते जोडून आठ वर्षे पूर्ण झाली होती......आणी आजच सभागृहात झेड.पी. सभासद म्हणून त्या शपथही ग्रहण करणार होत्या.....गाढ झोपलेल्या राजाभाऊंवर एकवार नजर फिरवत त्या बिछान्यातून उठल्या, देवघरात जाऊन देवाला नमन करीत त्यांनी मागल्या पडवीचे दार उघडले. त्यांना बघताच कृष्णा अजूनच जोरजोरात हंबरायला लागली. तिच्या पुढे चाऱ्याची चळत व पाण्याची बादली ठेवून त्यांनी तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवला.....देवा पाठोपाठ कृष्णा गायीचे दर्शन घेतल्या खेरीज त्यांच्या दिवसाला सुरुवात होत नसे.सकाळची सर्व कामे आटोपून होईपर्यंत राजाभाऊ कॉलेजला जायला तयार झाले होते. "आज काय आणू ?" हळूच त्यांनी विचारले.गोंधळात पडल्यासारखा चेहरा करीत त्या म्हणाल्या, "कशाबद्दल ? शपथ ग्रहण करणार म्हणून का ?"अवखळपणे हसत राजाभाऊ म्हणाले,"नव्हे... आम्हाला आजन्म कैदी बनवल्याबद्दल"सुरेखा ताईंच्या स्मितहास्या सोबत त्यांनी घर सोडले....
सुरेखा ताईंना दुपारची शाळा असे. बाराच्या ठोक्याला त्या घर सोडत त्यापूर्वी बालवाडीतल्या वैशुला त्या घेऊन येत. वैशुला आजी भरवत असताना त्यांना निघावे लागे. आज पासूनचा दिनक्रम वेगळा असणार होता. सकाळी दहाला वैशुला बालवाडीत सोडून त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयांत जाणार होत्या. सभागृहाच्या कामकाजाला सकाळी साडे दहाला सुरुवात होणार होती. दुपारी एकला सभागृह संपताच त्या घरी जाणार होत्या. काही दिवस हाच दिनक्रम ठेवून मग एखादी अंगणवाडी शिक्षिकेची नोकरी करायचा विचार त्यांनी केला होता. आपल्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हायलाच हवा ह्या राजाभाऊंच्या मतांशी त्या सहमत होत्या.
जिल्हापंचायतीच्या कार्यालयात त्या सव्वा दहाच्या सुमारास पोहचल्या तेव्हा एकही सभासद हजर नव्हता. गेल्या गेल्याच त्यांची मोकाशी नांवाच्या कारकुनाशी ओळख झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव श्री. नारायण अत्तरदेंचा तो सचिव होता. बरीचशी महत्त्वाच्या फायली ज्यांच्यावर शेवटचे हात फिरवावे लागत, त्या मोकाशींकडेच येत. मोकाशींनी तोंड भरून सुरेखाताईंचे कौतुक केले..."राजाभाऊ जाधवांना मी ओळखतो ताई.... आपले भाषणही ऐकले आहेच, तुम्हाला आठवत नाही पण आंबेगावहून आपली बदली येथे झाली तेव्हा त्या फाइल वर मीच काम केले होते." मोकाशींनी आठवणी सांगितल्या."हो, मी लग्नापूर्वी आंबेगावलाच शिक्षिका म्हणून होते....पण मी बदलीच्या कामानिमित्त झेड.पी. त मात्र कधी आले नव्हते" त्यांनी आठ वर्षापूर्वीच्या त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करीत म्हटले.इतक्यात भराडे बाई व माळी वहिनी तेथे आल्या.सगळ्या जणी मग सभागृहाकडे कुच करू लागल्या. एका नव्या युगांत सुरेखाताईंचा प्रवेश होत होता......
एक एक करीत सभासद सभागृहात दाखल होत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध समित्या व उपसमित्यांचे सदस्य हे एकत्रच जिल्हा परिषदेच्या कामकाजाखाली मोडत. ग्रामपंचायत व झेड.पी.च्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा तर समित्यांच्या सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल असे सरकारने ठरवून दिले होते. झेड.पी.चे सदस्य जिल्हा पंचायतीच्या अख्यतारीत येत असलेल्या कामकाजांवर प्रतिनिधित्व करीत तर ग्राम पंचायतीच्या कामांवर त्यांचे सदस्य काम करीत.प्रत्येक समितीवर एक सभापती, एक उपसभापती, तीन झेडपी सदस्य, तिघे ग्रामपंचायतीचे सदस्य व तीन नगरपालिकेचे सदस्य काम बघत.समितीकडे कामकाज जास्त असल्यास उपसमीती नेमली जाई. नगरपालिकेचे सदस्य स्वत:च्या वेगळ्या निवडणुकांतून निवडून येत व त्यांचे अधिकार मर्यादित असले तरी त्यांच्या अनुमतीखेरीज कामे पुढे सरकत नव्हती. झेड.पी., ग्राम पंचायत व नगरपालिका ह्या तिघी स्वायत्त संस्था होत्या व गावागावातून राज्य व केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात त्यांना मदत करीत होत्या. राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या झेड.पी व ग्रामपंचायतींच्या सभासदांना पगार व भत्ते राज्य सरकार देई तर नगरपालिकेच्या सभासदांना नगरपरिषद देई.वरचा मलिदा मात्र त्यांना स्वत:ची अक्कल लढवूनच कमावावा लागे.......
सुरुवातीसच ओळख समारंभ पार पडला त्यानंतर लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्तरदेंनी वयोवृद्ध वासुभाऊंना शपथ ग्रहण करायला व्यासपीठावर बोलावले. इतरांनी जेष्ठते नुसार एका पाठोपाठ एक स्वत:च्या डायस समोरच उभे राहून शपथ घ्यायची होती.......
उंच छत असलेल्या भव्य सभागृहात एक आवाज अत्यंत आत्मविश्वासाने उमटला.......
"मी, सौभाग्यवती सुरेखा राजेश्वर जाधव, ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेते की.........
'तेजस्विनी'च्या एका नव्या पर्वाच्या प्रथम अध्यायाला सुरुवात झालेली होती.
~समाप्त~
Wednesday, December 6, 2006
ठाणे कट्टा- अनुभवकथन

ठाणे कट्ट्यावर प्रत्येक उपस्थित मनोगतीने आपला आविष्कार प्रकट केला. मी माझ्या कलकत्त्याच्या रहवासातले अनुभवकथन काहीसे अशा रितीने केले..... शब्द न् शब्द आठवत नसला तरी कथन असे होते-
*******************
*******************
आपल्या जवळ जे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते त्याची किंमत आपणास कळत नसते हा अनुभव मला महाराष्ट्र व मराठी माणसे सोडल्यावर मिळाला.
जेथे पूर्वी नोकरी करीत असे तेथून 'कलकत्त्याचे कार्यालय' उघडण्याचा व सुरू करण्याचा आदेश हातात पडला..... बदली झाल्याक्षणी कलकत्त्याची काही जुजबी माहिती काढली व बाड बिस्तर घेऊन मार्गस्थ झालो. कलकत्त्याचा कर्मचारी (जो आधीच नेमला गेला होता) वेळेवर हावडा स्थानकावर घ्यायला आलाच नाही. ५/६ तास वाट बघून शेवटी जायचे ठरवले.
'तुला कुठे काही समस्या आल्यास हाजरा रोड वरील महाराष्ट्र मंडळात जा' असे मामांनी निघताना सांगितल्याचे एकदम आठवले. कसे बसे एकदाचे सामान टॅक्सीत कोंबले व हाजरा रोड वरील महाराष्ट्र निवासात पोहचलो....
टॅक्सीतून सामान उतरवत असतानाच दारवानाने प्रश्न केला "क्या साब ट्रान्स्फर हो गया है क्या ?"
"अरे वा तुला कसे कळले ?"
"सब मराठी लोग ट्रान्स्फर होने के बाद इधर ही आते है !" ( चला मीच एकटा मूर्ख ठरलेलो नव्हतो तर !)
व्यवस्थापक श्री. प्रभाकर डोळ्यांकडे जाऊन उभा राहिलो-
"खोली ? एप्रिल महिन्यात सगळे बुक असते हो कुळकर्णी "
"काहीतरी करा आता, मी तर सगळे सामान घेऊनच आलो आहे."
"डॉर्मेट्रीत सोय करतो मग दोन दिवसात बघू काय करायचे ते !"
स्थिरस्थावर झाल्यावर व भाड्याने घर घेतल्यावर नियमित महाराष्ट्र निवासात जाऊ लागलो.
स्थिरस्थावर झाल्यावर व भाड्याने घर घेतल्यावर नियमित महाराष्ट्र निवासात जाऊ लागलो.
तेथल्या वयस्कर मंडळींनी आस्थेने विचारपूस करीत ओळख वाढवली. सम वयस्क मंडळीही येता जाता स्मितहास्य देत असत. हळू हळू मी कलकत्त्यात रुळू लागलो होतो.....
अचानक एक दिवस मला अपघात झाला व माणुसकीचा प्रत्यय ह्या नवख्या शहरात आला. फक्त महाराष्ट्र निवास हे उद्गार तोंडातून बाहेर पडताच महाराष्ट्र निवास व मंडळाच्या सदस्यांनी जी मदत केली ती आयुष्यात न विसरण्याजोगी आहे. इस्पितळात दोन वेळचा डबा ते औषधोपचार व सर्व प्रकारची मदत ह्या अनोळखी मराठी मंडळींनी केली.
अचानक एक दिवस मला अपघात झाला व माणुसकीचा प्रत्यय ह्या नवख्या शहरात आला. फक्त महाराष्ट्र निवास हे उद्गार तोंडातून बाहेर पडताच महाराष्ट्र निवास व मंडळाच्या सदस्यांनी जी मदत केली ती आयुष्यात न विसरण्याजोगी आहे. इस्पितळात दोन वेळचा डबा ते औषधोपचार व सर्व प्रकारची मदत ह्या अनोळखी मराठी मंडळींनी केली.
आज मी कलकत्त्याच्या ह्याच महाराष्ट्र मंडळाचा आजीव सदस्य आहे. नंतरच्या काळात युवा सचिव (युथ सेक्रेटरी) होतो, एकांकिका स्पर्धेत एकांकिका दिग्दर्शित केली, गणेशोत्सवात सक्रिय सहभाग होताच.... व मुंबईला परते पर्यंत असंख्य नाती जोडली गेलीत. आजही ही नाती टिकून आहेत व मैत्री दृढ झालेली आहे !
कोणाची कलकत्त्याला बदली झाल्यास हाजरा रोड वरचे महाराष्ट्र निवास व श्री. प्रभाकरराव डोळे हे नांव लक्षात ठेवा..... बाकीची सोय आपोआप होईल !
Subscribe to:
Posts (Atom)

